स्वतंत्र सेनानी भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आजाद यांचे स्मारक उभारण्याची मागणी

सर्जेपुरा रंगभवन सि. सर्व्हे नं. ७१८९ या महापालिकेच्या   जागेवर स्वतंत्र सेनानी भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आजाद यांचे स्मारक उभारण्याची मागणी

समाजवादी पक्षाच्या वतीने आयुक्त व महापौर यांना निवेदन देण्यात आले

अहमदनगर (प्रतिनिधी) -  सर्जेपुरा रंगभवन सिटी सर्व्हे नं.७१८९ हि जागा महानगर
पालिकेची आरक्षण असलेली जागा आहे या जागेवर स्वतंत्र सेनानी भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचे स्मारक उभारण्यात यावे मौलाना अबुल कलाम आझाद,यांनी 1940-45 च्या दरम्यान ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते ज्या दरम्यान भारत छोडो आंदोलन झाले.त्यावेळी त्यांना तीन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. त्याकाळी ऐतिहासिक अहमदनगर भोईकुट किल्ला ब्रिटीश राजांनी त्याचा तुरुंग म्हणून वापर केला यावेळी मौलाना अबुल कलाम आझाद हे 3 वर्ष भोईकुट किल्ला येथे नजर कैद असताना यांनी प्रशंसित "गुबार-ए-खातीर" (सॅलीज ऑफ माइंड) हि पुस्तक अहमदनगर च्या धर्तीवर लिहिली स्वातंत्र्यानंतर ते भारताचे पहिले शिक्षणमंत्री झाले.त्यांनी अनेक योगदान देशासाठी दिले अश्या महान स्वतंत्र सैनानी यांचे स्मारक म्हणजे नवीन पिढीसाठी चांगले उदाहरण ठरेल तसेच यावर्षी प्रथमच आपल्या अहमदनगर महानगरपालिकेत अबुल कलाम आझाद यांची जयंती देखील साजरी करण्यात आली, सामाजिक शैक्षणिक व संस्कृतीक स्मारकाने समाजातील पदवी व शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थी करिता स्पर्धा मार्गदर्शन केंद्र असलेले स्मारक अपेक्षित आहे या सर्वबाबी लक्षात घेऊन सर्जेपुरा रंगभवन सिटी सर्व्हे नं.७१८९ या जागेवर भव्य असे मौलाना अबुल कलाम आझाद यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी समाजवादी पक्षाचे दक्षिण जिल्हाअध्यक्ष अजीम राजे यांनी केली.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा