अल्पवयीन मुलीस आत्महत्या करण्याची धमकी देऊन पळून नेऊन तिच्यावर शारिरीक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा

अहमदनगर : आरोपी नामे शिवाजी भाऊराव सुर्यवंशी , वय - ३७ वर्षे , रा . ब्राम्हणी ता . राहुरी . जि . अहमदनगर याने १४ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमीष दाखवून तसेच आत्महत्या करण्याची धमकी देवून तिला पळून नेवून तिचेवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी अहमदनगर येथील मा . माधुरी एच . मोरे मॅडम , अतिरिक्त व विशेष ( पोक्सो कोर्ट ) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दोषी धरून भा.दं.वि. कलम ३७६,३७६ ( २ ) ( एन ) ३७६ ( ३ ) , ३६३,३६६ ( अ ) , ३२३,५०४,५०६ तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम ४,६,८,१२ नुसार दोषी धरून आरोपीस भा.द.वि. कलम ३७६ ( ३ ) नुसार २० वर्षे सक्त मजुरी व रूपये २,००० / - दंड व दंड न भरल्यास २ महिने साधी कैद , भा.द.वि. कलम ३६६ ( अ ) नुसार २ वर्षे सक्त मजुरी व १,००० / - दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद , भा.द.वि. कलम ५०६ नुसार ६ महिने सक्त मजुरी व दंड रूपये ५०० / - दंड न भरल्यास ८ दिवस साधी कैदेची शिक्षा सुनावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . घटनेची थोडक्यात हकीगत की , दिनांक १६.११.२०२१ चे रात्री पिडीत मुलगी हिस अज्ञात व्यक्तीने पळून घेवून गेल्याची फिर्यादी पिडीत मुलीच्या काकाने राहुरी पोलिस स्टेशनला दिली . सदरची फिर्याद दाखल झाल्यानंतर राहुरी पोलिसांनी भा.द.वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा नोंदविला . प्राथमिक तपास पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव तसेच सहा . फौजदार सी . एन . ब - हाटे • यांनी केला . तपासाचे दरम्यान पिडीत मुलगी ही मिळुन आली . तिचेकडे पोलिसांनी चौकशी केली असता , तीने सांगितले की , ती आरोपी नामे शिवाजी सुर्यवंशी याला २०१ ९ पासून ओळखत होती . आरोपी याचे लग्न झालेले असून त्याला तीन मुले आहेत . पिडीत मुलगी ही शेतात काम करत असताना तसेच इतर वेळेस कोणीही नसताना आरोपी हा तिचे जवळ येत असे व तिचेशी बोलण्याचा प्रयत्न करत असे . तसेच आरोपीने पिडीत मुलीस बळजबरीने मोबाईल देवून तिचेशी बोलत असे . त्यानंतर आरोपीने पिडीत मुलीला धमकी दिली की , जर तु माझेशी बोलली नाही तर मी आत्महत्या करेल व तुझे व तुझ्या आईवडीलांचे नाव चिठ्ठीमध्ये लिहून ठेवून . त्यामुळे पिडीत मुलगीही घाबरून गेली व पिडीत ही आरोपीशी बोलू लागली . दिनांक १५.११.२०२१ रोजी आरोपीने पिडीत मुलीला घराचे बाहेर भेटायला बोलावले व आपण दोघे पळून जावून लग्न करू असे म्हणाला . त्यावेळी पिडीत मुलगी नाही म्हणाला असता आरोपीने तिच्या आई वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली व स्वतः विष पिऊन
आत्महत्या करेल असे म्हणाला . त्यानंतर दिनांक १७.११.२०२१ रोजी पहाटे २ वाजणेच्या सुमारास आरोपीने दिलेल्या धमकीमुळे पिडीत मुलगी घाबरून जावून आरोपी सोबत • मोटारसायकलवर करमाळा सोलापूर येथे गेले . करमाळा येथे एका शेतामधील कोपीमध्ये आरोपीने पिडीत मुलीला ठेवले . आरोपीने दिनांक १७.११.२०२१ ते १२.१२.२०२१ पावेतो पिडीत मुलीवर वेळोवेळी शारिरीक अत्याचार केले याबाबतचा जबाब पिडीत मुलीने राहुरी पोलिसांसमोर दिला , घटनेचा तपास पूर्ण करून पोलिस उप निरीक्षक निरीज बोकील यांनी मा . न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले . या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले . यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी , पिडीतेचे काका , पंच साक्षीदार तपासी अधिकारी यासंदर्भात मुख्याध्यापक , ग्रामसेवक व वैद्यकिय अधिकारी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या . सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला की , सदरच्या घटनेमधील आरोपी हा विवाहित असून त्यास मुले आहेत तसेच आरोपीचा एक मुलगा व पिडीत मुलगी हे एकाच वयाचे होते . आरोपी हा विवाहीत असून देखील हा पिडीत अल्पवयीन मुलीस आत्महत्या करण्याची धमकी देवून पळवून घेवून गेला . वास्तविक पाहता , सदर केसमधील पिडीत मुलगी ही १३ वर्षे वयाची होती . आरोपीने दिलेल्या धमकीमुळे ती पुर्णपणे घाबरून गेलेली होती . आरोपी विवाहित असून तिला लग्नाचे आमिष दाखवून पळून नेले . वास्तविक पाहता , आरोपीचे लग्न झाले असल्याने पिडीत मुलीला पळवून घेवून जाणे यामागे आरोपीचा पिडीत मुलीचा लैगिंक शोषण करणे हा एकमेव उद्देश होता . त्यामुळे या केसमध्ये आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा दिली तर समाजातील विकृतींवर आळा बसेल व अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडून येणार नाहीत . सदरच्या केसमध्ये आरोपीस आज महिला दिनाचे दिवशी २० वर्षे शिक्षा मे . कोर्टाने दिलेली आहे . त्यामुळे या शिक्षेला जास्त महत्व प्राप्त झालेले आहे . सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद व केस मध्ये झालेला पुरावा ग्राहय धरून आरोपीस मा . न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . त्यांना पैरवी अधिकारी आडसुळ , तसेच पो.कॉ. पठारे व पो.कॉ. वाघ यांनी सहकार्य केले . 
अहमदनगर ता . ०८/०३/२०२३ 

( ॲड . मनिषा पी . केळगंद्रे- शिंदे )
 विशेष सरकारी वकील , अहमदनगर .
 मो . ९ ८५०८६०४११,
८२०८ ९९ ६७ ९ ५

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा