गजानन हाॅस्पिटलमधील केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम शिबिरात ६० कर्णबधीर बाल रुग्णांची तपासणी


मख़दूम समाचार 
अहमदनगर (प्रतिनिधी) १.८.२०२३
    येथील कान, नाक, घसा विकारांवरील उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या गजानन हाॅस्पिटलमध्ये कर्णबधीरपणा तपासणीच्या 'मॅपिंग व काॅक्लियर इम्प्लांट सर्जरी समुपदेशन' शिबिरात ६० बाल रुग्णांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती कान, नाक, घसा तज्ज्ञ डाॅ. गजानन माेहनीराज काशीद यांनी दिली. या शिबिरात २५ बाल रुग्णांची मॅपिंग चाचणी करण्यात आली. तर दहा रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान झाले. त्याबाबत अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संजय घाेगरे आणि अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. साहेबराव डावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील निर्णय घेतला जाईल, असे डाॅ. गजानन काशीद यांनी सांगितले.

 केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हे शिबिर रविवारी दिल्लीगेट येथे असलेल्या गजानन हाॅस्पिटलमध्ये पार पडले. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. साेनाली बांगर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी वरिष्ठ अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. महावीर कटारिया, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डाॅ. वैजनाथ गुरवले, कान, नाक, घसा तज्ज्ञ डाॅ. गजानन काशीद, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुनीता चाैरे, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाचे समन्वयक विजय दळवी, डाॅ. राहुल पवार, ऑडिओलॉजिस्ट डाॅ. प्रशांत निर्मळ, ऑडिओलॉजिस्ट डाॅ. विठ्ठल उंडे, ऑडिओलॉजिस्ट डाॅ. अमृता दिवाणमल आदी उपस्थित हाेते.    
डाॅ. साेनाली बांगर म्हणाल्या, "राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत हे शिबिर गजानन हाॅस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार पडले. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 'मॅपिंग व काॅक्लियर इम्प्लांट सर्जरी' माेफत आहे. पूर्वी अशा रुग्णांच्या उपचारासाठी मुंबई किंवा पुणे येथे जावे लागत हाेते परंतु गजानन हाॅस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्रणेमुळे अहमदनगरमध्येच लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांवर हे उपचार करणे शक्य झाले. त्याचा अनेक रुग्णांना नक्कीच फायदा होत आहे."  
    डाॅ. गजानन काशीद म्हणाले, "कर्णबधीर असलेल्या बाल रुग्णांसाठी 'मॅपिंग व काॅक्लियर इम्प्लांट सर्जरी' खूप गरजेची असते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत समुपदेशन शिबिर घेऊन याविषयी जनजागृती केली. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांसाठी हे शिबिर वरदान ठरले आहे. या शिबिरात ६० बालरुग्णांची तपासणी झाली. यातील २५ जणांची मॅपिंग चाचणी झाली, तर १० रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे समाेर आले." 
     जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. महावीर कटारिया, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डाॅ. वैजनाथ गुरवले, विजय दळवी, राहुल पवार यांनी मनाेगत व्यक्त केले. शिबिरात अहमदनगर जिल्ह्यासह बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातून रुग्ण सहभागी झाले हाेते. ऐकायला कमी येणाऱ्या  बालकांवर 'मॅपिंग व काॅक्लियर इम्प्लांट सर्जरी' किती उपयुक्त आहे, याची माहिती पालक प्रसाद शेंडकर यांनी दिली. तसेच ज्या बालकावर ही शस्रक्रिया यशस्वी झाली आहे, त्याने उपस्थितांसमाेर नाव, गाव, शाळा आणि पत्ता अशी सर्व माहिती सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. 
    शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची तपासणी कान, नाक, घसा तज्ज्ञ डाॅ. गजानन काशीद, ऑडिओलॉजिस्ट डाॅ. प्रशांत निर्मळ, ऑडिओलॉजिस्ट डाॅ. विठ्ठल उंडे, ऑडिओलॉजिस्ट डाॅ. अमृता दिवाणमल यांनी केली. औषध निर्माता सुनील साेनवणे आणि सारिका धुमाळ, परिचारिका प्रियंका तांबे, गजानन हाॅस्पिटलचे मानव संसाधन विभागप्रमुख विनाेद लठाड, दीपक गायकवाड, अविनाश पावडे, दिगंबर निवलकर, तेजस्विनी चाेरगे, परिचारिका पाैर्णिमा चव्हाण, अश्विनी उबाळे, अंजली बेंद्रे, प्रियंका पवार, चंद्रभागा धिंदले, फिराेज सय्यद, विकास वायाळ, प्रदीप कराळे, अक्षदा म्याना तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे अहमदनगर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, परिचारीका, मदतनीस, आशा वर्कर्स यांनी शिबिर यशस्वी हाेण्यासाठी परिश्रम घेतले. ओंकार व्यवहारे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा