बिलकीस बानो प्रकरण कोणत्या आधारावर दोषींना सोडले ? सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला प्रश्न

नवी दिल्ली : बिलकीस बानो यांच्या कुटुंबियातील सदस्यांची हत्या आणि सामूहिक बलात्कार प्रकणातील दोषी असलेल्या ११ आरोपींना शिक्षेतून मुक्त केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला धारेवर धरले.
देशाच्या सर्वोच्च न्यायपालिकेने
उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केल्यामुळे गुजरात सरकार अडचणीत आले आहे.
आरोपींना देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेऐवजी त्यांना जन्मठेप का सुनावली गेली? १४ वर्षे तुरुंगावास भोगल्यानंतर त्यांना मुक्त का करण्यात आले ? बिलकीस
बानो प्रकरणातील आरोपींना जसे
सोडले, तोच न्याय इतर कैद्यांना का लावला गेला नाही ? असे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला केले आहेत.
गुजरात सरकारला प्रश्न : न्यायमूर्ती बी. वी. ना-गरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुइया यांच्या खंडपीठाने बिलकीस बानोच्या याचिकेवर सुनावणी केली. बिलकीस बानो प्रकरणातील दोषींना तुरुंगातून मुक्त करण्याचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने घेतला. त्या निर्णयाला बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा