अल-करम हाॅस्पिटलच्या रक्तदान शिबीरात 150 जणांचे रक्तदान

 युवकांनी रक्तदान चळवळीत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे- अमोल बास्कर 
अहमदनगर - रक्त हे कोणत्याही फॅक्टरीत तयार होत नसल्याने त्याची गरज भासल्यास मनुष्यालाच रक्तदान करावे लागते. एखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासल्यास त्यास ते वेळेत मिळणे गरजेचे असते. यासाठी युवकांनी रक्तदान करुन या चळवळीत सहभागी झाले पाहिजे. अत्याधुनिक उपचार पद्धतीने रक्ताचे विघटन होत असल्याने एका रक्तदात्याचा अनेकांना फायदा होत असल्याने या पुण्यकार्यात सहभागी व्हावे. अल-करम संस्थेच्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे इतरांनाही प्रेरणा मिळणार आहे, अशा उपक्रमाची समाजाला गरज आहे,असे प्रतिपादन इतिहास प्रेमी व गाईड अमोल बास्कर यांनी केले.
स्वातंत्र दिनानिमित्त अल-करम सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशनल सोसायटीच्या अल करम हॉस्पिटलच्या वतीने अहमदनगर किल्ल्यात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होेते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मख़दुम सोसायटीचे अध्यक्ष आबिद दूल्हे खान, मराठा सेवासंघाचे इंजि. अभिजीत वाघ, शाहिद काजी,डॉ जहीर मुजावर, तौसिफ रेडियमवाला, अरशद सैय्यद, शाहीद सय्यद, सैफुद्दीन शेख, शाहनवाज तांबोली आदि मान्यवर उपस्थित होते. 
पुढे बोलतांना अमोल बास्कर म्हणाले, आज प्रत्येकाचे जीवनमान धावपळीचे झाले आहे, त्यामुळे रस्ते अपघाताबरोबरच इतरही अनेक कारणांनी रक्ताची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासत असते. अशा परिस्थितीत प्रत्येकाने कर्तव्य म्हणून वर्षभरातून एकदातरी रक्तदान करुन आपले सामाजिक दायित्व पार पाडले पाहिजे. आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून रक्तदान करणे जरुरी आहे, असेही त्यांनी सांगितले. 
रक्तसंकलनचे कार्य जिल्हा रुग्णालय ब्लॅड बँक, अर्पण ब्लॅड बँक यांनी केले. या शिबीरात 150 रक्त पिशव्यांची रक्तसंकलन करण्यात आले. या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शेरअली शेख म्हणाले की अलकरम सोसायटीच्या माध्यमातून आरोग्याच्या क्षेत्रात वर्षभर समाज उपयोगी उपक्रम सतत राबविले जात असते. म्हणून या उपक्रमामध्ये समाजातील लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे सांगितले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तौफिक तांबोली यांनी केले तर आभार समीर सय्यद यांनी मानले. 

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा