अहमदनगरचे १२ जागा लढण्याची एम आय एम करत आहे तैयारी - डॉ परवेज अशरफी

खा.ओवेसी ने दिले विधानसभा साठी कामाला लागण्याचे आदेश
अहमदनगर - लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडी आणि इंडिया गटबंधन ला  भरभरून मतदान केले. मुस्लिम समाजाचा पूर्ण देशात एकच लक्ष होता ते म्हणजे मोदी सरकार कोणत्याही परिस्थितीत येऊ नये. त्याकरिता प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने आपले परीने प्रयत्न केले, देशातील मौलानांनी बीजेपी व एन डी ए गटबंधन ला विरोधात जो मजबूत उमेदवार असेल त्याला मतदान करण्याचे आव्हान केले. अहमदनगर मध्ये दोन्ही लोकसभा  मतदारसंघात मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करून निवडूण आणले. जातीवादी शक्तीला रोखण्यासाठी पूर्ण समाजाने एकत्र येऊन महाविकास आघाडीला ताकद देण्याचा काम केले. अहमदनगर दक्षीण मधून एमआय एम चे उमेदवार डॉ परवेज अशरफी यांना सर्व समाजाने  अर्ज माघारी घेण्यास भाग पाडले. डॉ परवेज अशरफी यांनी समाजाचे प्रतिष्टीत लोकांचा मान ठेऊन तसेच सध्याचे परीस्तीतीत संविधान वाचवणे गरजेचे असल्याने मनाचा मोठेपण दाखून आपला अर्ज माघारी घेतले. 
औरंगाबाद येथे एम आय एम पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती त्यात सर्व जिल्हा अध्यक्ष यांना येणाऱ्या विधानसभा निवडणूक संदर्भात प्रत्यक विधानसभा क्षेत्राची चर्चा करण्यात आली. सदर बैठकीला एम आय एम चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी स्वतः हजर होते. महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नसला तरी मुस्लिम समाज महाविकास आघाडी सोबत खंबीरपणे उभा राहिला. फक्त याच आशेने की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कुठे ना कुठे मुस्लिम समाजाचा विचार करेल. इतकंच नव्हे तर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून देताना पूर्ण महाराष्ट्रातून फक्त औरंगाबाद मधून एम आय एम तर्फे मुस्लिम उमेदवार जिंकण्याची अपेक्षा मुस्लिम समाज करीत होता. परंतु सर्वांनी मिळून इम्तियाज जलील यांना हरवण्सायासाठी पूर्ण ताकद लावली. याचाच अर्थ महाविकास आघाडीला मुसलमानांचे मते हवे परंतु मुसलमानांचा नेता नको. 
विधानपरिषद निवडणुकीत मुस्लिम समाजाला अपेक्षा होती की महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष मुस्लिम उमेदवार देऊन कुठेतरी मुस्लिम समाजाला न्याय देईल परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी एकही उमेदवार मुस्लिम समाजाचा दिला नाही, तसेच जे दोन मुस्लिम आमदार विधान परिषदेत होते त्यांना हि डावलण्यात आले. याची नाराजगी पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे.काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. तरी महाविकास आघाडीने याची कोणतीही दखल घेतली नाही. 
औरंगाबाद येथे एमआयएम पक्षाचे बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर खासदार ओवैसी यांच्या नेतृत्वाखाली बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला व येणाऱ्या विधानसभेमध्ये कोणकोणत्या जागेवर एम आय एम ने आपले प्रतिनिधी द्यावे यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीत एमआयएम पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवेसी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, पश्चिम महाराष्ट्रातील अध्यक्ष अकील मुजावर, हैदराबादचे आमदार अहमद बालाला आदी उपस्थित होते. चर्चा दरम्यान अहमदनगर मध्ये विधानसभा निवडणूकी साठी तयारी करण्याचे संकेत एम आय एम अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी दिले.
अहमदनगर संदर्भात बोलताना एमआयएम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी  यांनी अहमदनगर जिल्ह्याचा अहवाल देऊन अशी विनंती केली की अहमदनगर जिल्ह्यातील १२ विधानसभा क्षेत्रामध्ये आपला प्रतिनिधी द्यावा. ज्या महाविकास आघाडीला मुस्लिम समाजाने मतदान केले आणि अहमदनगर लोकसभा मध्ये जातीवादी शक्तीला रोखण्यासाठी आपला उमेदवार अर्ज माघारी घेतला, तरी मविआ ला  मुस्लिम समाजाला न्याय देण्यास कोणताही रस नाही तर मुस्लिम समाजांनी या पक्षांचा संदर्भात विचार का करावा? विधान परिषदेमध्ये ही महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाला डावलण्याच्या चित्र आहे. 
डॉ परवेज अश्रफी म्हणाले की अहमदनगरची जनता ही जातीवादी पक्षाला आणि चुकीचा होत असताना कोणते आवाज न उचलणाऱ्या धर्मनिरपेक्ष पक्षांना वैतागली असून  जनतेला पर्यायाची गरज आहे. आणि तो पर्याय म्हणजे एमआयएम होऊ शकतो.
लवकरच अहमदनगर शहरासाहीत जिल्ह्यातील १२ विधानसभा क्षेत्राचे इच्छुक उमेदवारांची यादी पक्षश्रेष्ठींना देणार असल्याचे ही डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्तीत  होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा