लवकर शाळा भरविण्यारयांवर कारवाई करण्याची एमआयएमची मागणी

अहमदनगर - शहरात, तालुक्यात, जिल्हयात व महाराष्ट्रात पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळेचे वेळ हा सकाळी ७ पासून सुरु होतो व विद्यार्थ्यांच्या शाळेचे वेळ सकाळी ७ वा. पासून असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासन यांचे दिनांक ०८/०२/२०२४ रोजी शासन परिपत्रक क्रमांक : संकिर्ण २०२४/प्र.क्र.२७/एस.डी.-४ अन्वये पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळेचे वेळ सकाळी ७ वा. पासून बदलून सकाळी ९ वा. पासून चालु करण्याचे आदेश दिलेले आहे.
परंतू शहरात, तालुक्यात अथवा जिल्हयात महाराष्ट्र राज्याच्या जी.आर. प्रमाणे शाळा ९ वा. पासून सुरु न करता पुर्वीपासून चालु असलेल्या ७ वाजल्यापासून सुरु ठेवलेली आहे. व जेणे करुन विद्यार्थ्यांना खुप त्रास सहन करावा लागत आहे व महाराष्ट्र राज्याच्या जी.आर.चा उल्लंघन केलेला आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या जी.आर.चा उल्लंघन करुन पुर्ववत ७ वा. चालू असलेल्या शाळांवर शिक्षण विभागाने  योग्य ती चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करावी. अशी मागणी एम आय एम चे जिल्हामहासचिव शेख जावेद हाजी, शहर प्रमुख खान सनाउल्लाह, युवा अध्यक्ष खान अमिर, नेते शेख इम्रान, शेख कैसर आदींनी शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा