अहमदनगर - शहरात, तालुक्यात, जिल्हयात व महाराष्ट्रात पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळेचे वेळ हा सकाळी ७ पासून सुरु होतो व विद्यार्थ्यांच्या शाळेचे वेळ सकाळी ७ वा. पासून असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासन यांचे दिनांक ०८/०२/२०२४ रोजी शासन परिपत्रक क्रमांक : संकिर्ण २०२४/प्र.क्र.२७/एस.डी.-४ अन्वये पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळेचे वेळ सकाळी ७ वा. पासून बदलून सकाळी ९ वा. पासून चालु करण्याचे आदेश दिलेले आहे.
परंतू शहरात, तालुक्यात अथवा जिल्हयात महाराष्ट्र राज्याच्या जी.आर. प्रमाणे शाळा ९ वा. पासून सुरु न करता पुर्वीपासून चालु असलेल्या ७ वाजल्यापासून सुरु ठेवलेली आहे. व जेणे करुन विद्यार्थ्यांना खुप त्रास सहन करावा लागत आहे व महाराष्ट्र राज्याच्या जी.आर.चा उल्लंघन केलेला आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या जी.आर.चा उल्लंघन करुन पुर्ववत ७ वा. चालू असलेल्या शाळांवर शिक्षण विभागाने योग्य ती चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करावी. अशी मागणी एम आय एम चे जिल्हामहासचिव शेख जावेद हाजी, शहर प्रमुख खान सनाउल्लाह, युवा अध्यक्ष खान अमिर, नेते शेख इम्रान, शेख कैसर आदींनी शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
Post a Comment