महानगरपालिकेच्या तयारी संदर्भात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची कोर कमिटीची बैठक संपन्न

आगामी पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची कोर कमिटी बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन पुणे येथे संपन्न झाली. 
आगामी महानगरपालिका निवडणुकी संदर्भात प्रामुख्याने आघाडी बाबत शहरातील सद्यपरिस्थितीचा आढावा घेत सकारात्मक चर्चा झाली, प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या प्रभाग रचनेसंदर्भात निर्माण होणाऱ्या संभाव्य तक्रारींबाबत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे, पालिकेत यापूर्वी सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीने नियोजनबद्ध विकास न करता शहरात केलेल्या चुकीच्या कामामुळे आज शहराची झालेली वाताहत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पावसाळ्यात शहरातील अनेक भागांमध्ये शासनाचे पाणी यातून होणारे नुकसान पर्यावरणासंदर्भात हाती घेण्यात आलेले चुकीचे प्रकल्प या सर्व चुकीच्या कामांची माहिती सर्वसामान्य पुणेकरांपर्यंत पक्ष पोहोचवणार आहे तसेच पक्षाची शहरातील संघटनात्मक बांधणी मजबूत असून पक्षाच्या सर्व सेलला निवडणुकीसाठी तयार ठेवण्याचे देखील या बैठकीत ठरविण्यात आले आहे. 
यांसह वेगवेगळ्या विषयांवर या कोअर कमिटीच्या बैठकीदरम्यान चर्चा झाली.
या बैठकीसाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेत्या माजी खासदार वंदनाताई चव्हाण, माजी आमदार जगन्नाथबापू शेवाळे, माजी आमदार जयदेवजी गायकवाड, आमदार श्री.बापूसाहेब पठारे, माजी आमदार कमलनानी ढोले पाटील, ज्येष्ठ नेते अंकुशअण्णा काकडे, रवींद्रअण्णा माळवदकर, विशाल तांबे ,अश्विनीताई कदम, श्रीकांत पाटील ,सचिन दोडके ,भगवानराव साळुंखे ,डॉ.सुनील जगताप, पंडित कांबळे ,प्रकाश आप्पा म्हस्के आदी नेते तथा पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा