समाजवादी पार्टी तर्फे पुरातत्व विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले

अहमदनगर - समाजवादी पार्टी अहमदनगर तर्फे दिनांक 3 जून रोजी अहमदनगर शहरातील ऐतिहासिक वारसा नष्ट होत असून त्याकडे पुरातत्व विभाग अहमदनगर चा हेतू पुरस्सर दुर्लक्ष आहे, अहमदनगर चे संस्थापक यांची मजारला जाण्यासाठीच रस्ता नाही व इतर वास्तु उध्वस्त होण्याची पुरातत्व विभाग वाट पाहत आहे. समाजवादी पार्टी अहमदनगर तर्फे सदर विषयी कारवाई झाली नाही तर 12 जून रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु गेंड्याची कातळीचे निर्लज्ज व कामचुकार अधिकारी व कर्मचऱ्यांनी आमच्या आंदोलनास पूर्ण डोळे झाक केली. त्यांचं मुस्लिम द्वेष पूर्णतः बाहेर आले. समाजवादी पार्टी अहमदनगर या विषयी पूर्ण पाठ पुरावा करून पुरातत्व विभागाशी पूर्ण संघर्ष करून वरील ऐतिहासिक वास्तूंना पुन्हा सुस्थितीत करण्याचा प्रयत्न करणार.आज ठिय्या आंदोलन करण्यात आले जर या उपर ही सदर वास्तूंना संवरक्षित करण्यात आले नाही तर या पुढे पुरातत्व विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल. व वेळ प्रसंगी सदर अधिकारीच्या तोंडाला काळे फासण्यात ही समाजवादी पार्टी मागे पुढे पाहणार नाहीत असे या निवेदनात म्हटले आहे.
पुरातत्व खाता औरंगाबादचे पत्र समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष आबीद हुसैन यांना मिळाले. सामना नेण्यात जागा मिळाल्यास पुढचा काम करू व नेअमत ख्वानी महालचाही काम लवकरात लवकर करू असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 
या आंदोलनात आसिफ रजा, अल्ताफ लकडावाला, तन्वीर सय्यद, गनी राज, मतीन खान, एजाज हाजी, तन्वीर बागबान, रफिक बाबुलाल, मुनीर शेख, कलीम शेख, सयीद खान, रशीद कुरेशी, समि अहमद, सरफाराज शेख, समीर बिल्डर, व आबिद हुसैन सह समाजवादी पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा