टिपू सुलतान फाऊंडेशन तर्फे नंदुरबार शहरात ह.टिपू सुल्तान जयंती साजरी

नंदुरबार / प्रतिनिधी:
येथील शहिद टिपू सुलतान फाऊंडेशन तर्फे नंदुरबार शहरात हजरत शहिद टिपू सुल्तान यांची २७५ वी जयंती विविध सामाजाभिमुख उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

येथील पंच मंडळ पीर महंमद नाथानी वाचनालय याठिकाणी शहिद टिपू सुलतान फाऊंडेशन च्यावतीने थोर स्वतंत्र सेनानी, महायोद्धा,शेर ए म्हैसूर ह.फतेहअली उर्फ हजरत शहीद टिपू सुलतान यांच्या २७५ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहीद टिपू सुलतान फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाजभाई बागवान हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून धर्मगुरु हाफीज आबीद बागवान, प्रा.फारुख खाटीक, सामाजिक कार्यकर्ते बाबु ठेकेदार, रहेमान मोमीन, सत्यनारायण शर्मा, हिरालाल चौधरी, रामकृष्ण मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ह. शहीद टिपू सुलतान यांच्या तैलचित्राला अभिवादनाने करण्यात आली. यावेळी मदरसा मधील सर्व विद्यार्थ्यांनी पवित्र कुराण पठण करुन ह.शहीद टिपू सुलतान यांच्यासाठी फातेहा खॉनी करुन दुआ केली. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊंचे वाटप करण्यात आले तसेच पंच मंडळ पीर महंमद नाथानी वाचनालयास ह.शहीद टिपू सुलतान यांच्या कार्याविषयी माहिती असलेली माहिती पुस्तिका वाचण्यासाठी देण्यात आली.
यावेळी धर्मगुरु हाफीज आबीद बागवान म्हणाले की, फतेहअली उर्फ ह.शहीद टिपू सुलतान यांनी १५६ मंदिरांना जमीन व सोने - चांदी दान दिले होते. १० हजार सोन्यांची नाणी मंदिराला दान दिले होते. अशा दानशूर व्यक्तीमत्व असलेल्या ह.टिपु सुलतान यांच्या कार्याचा आदर्श घेत त्यांच्या सामाजहितैशी मार्गावर सर्वांनी चालले पाहीजे. 
सर्व थोर महापुरुषांची आठवण ठेवून सर्वांनी त्यांच्या कार्यांचा आदर्श घेतला पाहिजे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रंथपाल फिरोज काजी यांनी केले. तर आभार सद्दाम मोमीन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लाला बागवान, असलम कुरेशी, सलीम बागवान, आरीफ मोमीन, जाकीर शाह आदींनी  विशेष परिश्रम घेतले.

*वृत्त विशेष सहयोग*
हाजी एजाजभाई बागवान - नंदुरबार 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा