आई तुझ्या नावाने व्हावी नवी पहाट : लोककवी प्रशांत मोरे

कुकाणा ता.नेवासा - *आई संस्काराची खान असुन अनिष्ट रूढी परंपरांना फाटा देऊन आई ची महती सांगण्याची संधी कानडे परिवाराने दिली आहे,आई चे ऋण या जन्मात फिटने शक्य नाही,त्यामुळे आई-वडिलांना आहे तोवर अंतर देऊ नये,जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा केली पाहिजे* असे मत लोककवी प्रशांत मोरे यांनी व्यक्त केले.
*खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट,व्हावी तुझ्याच नावाने नव्या युगाची पहाट* 
स्व.लक्ष्मीबाई कडुभाऊ कानडे यांच्या आदरांजलीपर आईचा जागर या कवितांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 
     पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली जेऊर हैबती येथे कानडे मळ्यात हा कार्यक्रम झाला.यावेळी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी,प्रा.दशरथ खोसे, भानुदास वाघमारे,कवी सुभाष सोनवणे उपस्थित होते.
प्रा.मोरे यांनी श्रोत्यांशी संवाद साधत असताना आई व बापावरील अनेक कविता आई विषयाच्या अनेक आठवणी कवितांना जोडून सादर केल्या.
सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डॉ.अशोक कानडे, जेलर रेवणनाथ कानडे  व परिवाराने आयोजित केला होता.आईच्या आठवणींनी मंत्रमुग्ध होऊन श्रोते पाऊस सुरू असतानाही ऐकत होते, हा असा कार्यक्रम आगळावेगळाच नव्हे तर श्रोत्यांना अगदी आईच्या आठवणीत बुडवून टाकणारा कार्यक्रम असल्यामुळे आयोजकांना देखील कार्यक्रम आयोजित करून आपण एक परिवर्तनासाठी योग्य पाऊल उचललं अशीच भावना सर्वांच्या चेहऱ्यावर जाणवत होती.यावेळी माध्यमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष सुरेश मिसाळ,सुनील शेवाळे, दिगंबर रिंधे,आप्पा कांबळे,सुनील कानडे ,अण्णा पाटील,संजय कानडे यांच्या सह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देविदास अगरखं, किशोर गोरक्षनाथ कानडे, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक सुभाष सोनवणे यांनी केले. तर शेवटीं सुनील गोसावी यांनी आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा