सुसंस्कार माणूस म्हणून जगण्यासाठी उपयोगी पडतात - शर्मिला गोसावी

अहमदनगर - *सध्या अतिरेकी चंगळवादाने जीवन सौंदर्याची, संस्कृतीची हानी होत आहे,आर्थिक संपत्तीने घरेदारे संपन्न होतील,पण मने जर असंस्कृत राहिले तर माणसातून पशु निर्माण होतील,यासाठी कुटुंबातून संस्कार होण्याची गरज आहे,संस्था हे एक कुटुंब असून येथून होत असलेले सुसंस्कार माणूस म्हणून जगण्यासाठी निश्चितच उपयोगी पडतील*  असे मत ज्येष्ठ कवयित्री शर्मिला गोसावी यांनी केले.  डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन चे मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल,अहमदनगर च्या वतीने  ' नवदुर्गांचा जागर '  या कार्यक्रमात विळद घाट येथे त्या बोलत होत्या.
      मेडिकल कॉलेज सभागृहात महिला सेल च्या वतीने झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर मेडीकल कॉलेज चे डीन डॉ.सुनिल म्हस्के,डेप्युटी डायरेक्टर डॉ.अभिजित दिवटे, महिला सेल प्रमुख डॉ.शुभदा अवचट,डॉ.अनिता राऊत,डॉ. सुनीता निघुटे, शितल गिते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना कवयित्री शर्मिला गोसावी म्हणाल्या कि, 'वेगवेगळ्या रूपातील माणसे आपल्या अवतीभवती वावरत असतात, ज्याच्या ठाई एखाद्या रसाचा अतिरेक जास्त असेल तर त्या स्वभावाची ती माणसे होतात, साहित्यिकांच्या ठाई या सर्वच रसांचा अंतर्भाव थोड्या अधिक प्रमाणात झालेला असतो,या सर्व रसांना आपल्या भाषा सौंदर्याच्या साह्याने ते फुलविण्याचा प्रयत्न करतात, ही कला त्यांना जन्मजात अवगत असते म्हणून ते साहित्यिक बनतात,साहित्यिकाच्या ठाई असलेल्या या विविध रसाच्या अनुषंगाने साहित्यिक समाजासाठी आपले विचार प्रगट करत असतात.' यावेळी त्यांनी आपला साहित्यिक प्रवास उलगडून दाखवला. तसेच आपल्या काही रचना सादर केल्या. 
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नम्रता मराठे यांनी केले.तर शेवटी उर्मिला द्रविड  यांनी आभार मानले, यावेळी मेडिकल कॉलेजमधील सर्व महिला शिक्षकवृंद उपस्थित होता.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा