उर्दू माध्यमाची ॲड. आसिया युसुफ शेख बनली प्रथम वर्ग न्यायाधिश

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) - येथील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष एडवोकेट वाय के शेख यांची कन्या व आर एम एस कॉम्प्युटरचे शब्बीर भाई शेख यांची सून ॲडवोकेट सौ.आसिया राही शेख या नुकत्याच उच्च न्यायालय,मुंबई व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांनी घेतलेल्या न्यायिक सेवा परिक्षेत प्रथम वर्ग न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ही परिक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे.
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पदाच्या परिक्षेतील ६३ उमेदवारांची निवड यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात ॲड.आसिया युसुफ शेख यांची निवड झाली आहे.
 सौ.आसिया यांचे प्राथमिक शिक्षण श्रीरामपुरातील अलमिजान उर्दू प्राथमिक शाळेत झाले.माध्यमिक शिक्षण येथीलच खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूल मध्ये झाले तर बी एस एल एल एल बी चे शिक्षण श्रीरामपुरातीलच खासदार गोविंदराव आदिक लॉ कॉलेज येथे झाले.एलएलएम त्यांनी अहमदनगर येथील लॉ कॉलेजमधून पूर्ण केले.
गेली सात वर्ष त्यांनी श्रीरामपूर कोर्टामध्ये वकिली केली आहे.
कायद्याच्या अभ्यासात त्यांना वडील ॲडवोकेट वाय के शेख,चुलत बंधू, उच्च न्यायालयाचे एडवोकेट मजहर जहागीरदार, पुणे येथील ॲडवोकेट गणेश शिरसाठ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच सासरे शब्बीर भाई शेख व  एमबीए असलेले पती राही शब्बीर शेख यांची मोलाची साथ त्यांना मिळाली.
उर्दू माध्यमाची एक विद्यार्थिनी प्रथम वर्ग दंडाधिकारी झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेतर्फे त्यांचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण, सचिव आबीद खान व जिल्ह्यातील सर्व उर्दू प्रेमींनी अभिनंदन केले आहे.या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा