अहमदनगर : १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान प्रकाशित झालेले कथासंग्रह, काव्यसंग्रह,आत्मचरित्र,लेखसंग्रह,कादंबरी,बालवाड्मय,संशोधन ग्रंथ,समीक्षा ग्रंथ च्या दोन प्रती राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कारासाठी पाठवाव्यात ” असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले आहे.
पुरोगामी विचारांच्या व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन असणा-या शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित लेखक,कवींना प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात.त्यामध्ये कथाकथन,काव्यवाचन,परिसंवाद,चर्चासत्र,कथा-काव्य लेखन स्पर्धा, विविध पुरस्कार वितरण,पुस्तक प्रकाशन,बालसंस्कार शिबीर, इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात. त्यानंतर वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. कोविड मुळे मागील दोन वर्ष साहित्य संमेलन झालेले नसून यावर्षी “ पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन” लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.त्यासाठी पुस्तकं मागविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.
सन २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती,परिचय,पोस्टाची रु ५ ची ५ तिकिटे ३१ जानेवारी २०२३ पर्यंत शब्दगंध साहित्यिक परिषद, फुलोरा, लक्ष्मी कॉलनी, तपोवन रोड, सावेडी,अहमदनगर – ४१४००१ मो.९९२१००९७५० येथे पाठवावे असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक कानडे,कार्यवाह सुभाष सोनवणे,खजिनदार भगवान राऊत, सहकार्यवाह अजयकुमार पवार,उपाध्यक्ष प्राचार्य गुंफा कोकाटे,शाहिर भारत गाडेकर,सहसचिव प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर,सुनीलकुमार धस,राज्य संघटक शर्मिला गोसावी,प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फंड, संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे,सदस्य किशोर डोंगरे,राजेंद्र पवार,बबनराव गिरी,स्वाती ठुबे,रामकिसन माने,हरिभाऊ नजन,प्रा.डॉ.किशोर धनवडे,प्रा.डॉ.संजय दवंगे,डॉ.अनिल पानखडे व जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोभे यांनी केले आहे.
Post a Comment