चाँद सुलताना हायस्कुल येथे वली रहेमानी 30 आयोजित आयआयटीची जेईई व मेडिकलची नीटसाठी पूर्व परिक्षा

अहमदनगर-मुस्लिम समाजाची शैक्षणिक
आधोगती व त्याला कारणीभूत असणारी
मुस्लिम समाजाची बिकट आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून बिहार येथील वली रहेमानी -३० या संस्थेच्या वतीने मुस्लिम समाजासाठी सुरु केलेल्या आयआयटी, जेईई व मेडिकलची एआयपीएमटी,नीट परिक्षेसाठी १० वीची परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व परिक्षा झाली. संपूर्ण राज्यातून त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या परिक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना रहमानी ३० संस्थेतर्फे ११ वी व १२ वी
चे शिक्षण व्यवस्था जेईई व एआयपीएमटी ची तयारी करण्यात येणार आहे.
मुस्लिम समाजाच्या आयआयटी व मेडिकल मधील टक्का वाढावा, विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षे बद्दलचे अज्ञान दूर करून त्यांना मार्गदर्शन करून या परीक्षेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन वली रहमानी 30 यांनी केले होते. ही परीक्षा ए टी यु चांद सुलताना हायस्कूलच्या सहकार्याने संपन्न झाली.या परिक्षेत 56 विधार्थांनी भाग घेतला.
यावेळी संस्थेचे चेअरमन अब्दुल मतीन, सैय्यद असगर आदि पदाधिकारी,परिक्षेसाठी केंद्रप्रमुख तांबोली मोहम्मद युसूफ,परिक्षा समन्वयक शेख अकिल अहमद,मुख्याध्यापक शेख समी इमाम, उपमुख्याध्यापक तांबोली शफी खुदाबक्ष यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
मुस्लिम समाजाचा आयआयटी व मेडिकल मधील टक्का वाढावा, विद्यार्थ्यांमध्ये या परिक्षेबद्दलचे अज्ञान दूर करुन त्यांना मार्गदर्शन करुन या परिक्षेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी संस्थेचे पदाधिकार्यांनी केले.
अशा परिक्षा व इतरही स्पर्धात्मक परिक्षा भविष्यात ए टी यु चांद सुलताना हायस्कुल येथे आयोजित कराव्यात व शिक्षणात मागासलेल्या अल्पसंख्याक समाजास पुढे नेण्यास मदत करावी, असे पालक वर्गांनी नमूद केले व या उपक्रमाबद्दल सर्व पदाधिकारी व शिक्षकांचे कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा