चांदपीर यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार...

 


▫️मख़दुम समाचार▫️ 
नेवासा (कार्तिक पासलकर) २९.४.२०२३
      तालुक्यातील चांदा येथील युवकांनी एकत्र येत चांदपीरबाबा यात्रेनिमित्त शेतकऱ्यांमधे लोकप्रिय असलेल्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. परिसरातील अनेक बैलगाडाप्रेमींनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शर्यतीच्या यशस्वितेबद्दल युवकांचे कौतुक होत आहे. यात्राजत्रांमुळे गावातील सामाजिक वातावरण उत्तम राहून लोक एकजूट होतात, गावाचा विकास होतो.  
परंपरागत यात्रा थोडेसे कमिटीने दुर्लक्ष केल्याने गावात यंदा कसलेच समाजप्रबोधन करणारे नाटक,  लोकनाट्य तमाशा, कुस्त्यांचे हागामा भरवला नाही. ही गोष्ट लक्षात येताच युवकांनी स्वतः पुढाकार घेत गावात वर्गणी जमा करून यात्रेनिमित्त युवकांनी एकत्रित येऊन प्रथमच बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. पंचक्रोशीतील बैलगाडा प्रेमींनी यात सहभागी होऊन प्रथमच गावातील युवकांना या शर्यतीसाठी मार्गदर्शन केले. आलेल्या बैलगाडा मालकांना बक्षिसे देण्यात आली.
संध्याकाळी चांदपीर बाबांच्या समाधीवर फुलांची चादर मिरवणूक काढून विधिवत अर्पण करण्यात आली.  यात्रा कमिटीने दुर्लक्ष केले परंतु युवकांनी एकत्र येऊन यात्रा घडवून आणली. यामुळे गावातून युवकांचे कौतुक होत आहे.





🤩 देशाची फेव्हरेट बाईक स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक मध्ये; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज


Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा