संत निरंकारी मिशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा !

मख़दुम समाचार

अहमदनगर (प्रतिनिधी)  २४.६.२०२३

      संत निरंकारी मिशनच्यावतीने ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ देशभरातील ४०० हून अधिक शाखांमध्ये ‘वसुधैव कुटुंबकम’चा सिद्धांत समोर ठेवून स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास केला. मंडळाच्या अहमदनगर शाखेच्यावतीने मिस्कीन रोडवरील निरंकारी सत्संग भवनच्या प्रांगणात योग विद्या धामचे बबनराव बारगळ व गणेश येनगंदुल यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास ५० योग प्रेमींनी योगासने करीत योग दिवस साजरा केला. याप्रसंगी योगाचे महत्व व उपयुक्तता व्याख्यानाद्वारे उपस्थितांपुढे मांडण्यात आला.

     सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या निर्देशानुसार निरंकारी मिशनतर्फे आध्यात्मिकते बरोबरच वेळोवेळी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असून, सद्गुरु माताजींच्या कथनानुसार आपल्या सर्वांमध्ये आध्यतिमक जागृती तेव्हाच शक्य आहे. जेंव्हा आपण शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वास्थ राहू, ज्या योगे आपला सर्वांगिण विकास होऊ शकतो.

     संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्यावतीने सन २०१५ पासूनच योग दिवसचे विशाल स्वरुपात आयोजन करण्यात येत असून, या वर्षी सरकारच्या ‘वन वर्ल्ड वन हेल्थ’ सिद्धांतावर साजरा केला गेला. योग ही भारताच्या प्राचिन परंपरेतील एक अमुल्य देणगी आहे. ज्याचा जगातील अनेक देशांनी स्वीकार केला आहे. निरंतर योगाभ्यासाने तल्लख बुद्धी स्वस्थ हृदय, तणावमुक्त आनंदी व सहजसुंदर जीवन जगण्याची कला आपल्याला प्राप्त होते. म्हणूनच सध्याच्या धावपळीच्या युगात योगाची मानवाला नितांत आवश्यकता आहे, म्हणूनच अशा प्रकारच्या स्थास्थवर्धक कार्यक्रमांचे महत्व वाढत आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा