*शब्दगंध च्या राज्यस्तरीय खुल्या कथालेखन स्पर्धेत वैभव रोडी प्रथम तर डॉ. शैलजा करोडे द्वितीय*

अहमदनगर – “शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय खुल्या कथालेखन स्पर्धेमध्ये ६२ नवोदित कथाकारांनी सहभाग नोंदवला होता, यामध्ये 'झालंर' ,वैभव रोडे, शेवगाव प्रथम , 'असे हि रक्षाबंधन '  डॉ. शैलजा करोडे, नवी मुंबई द्वितीय तर ' ध्येयवेडा ' सुजित फलके, सोयगाव जि. औरंगाबाद,तृतीय यांना  पारितोषीक जाहिर करण्यात येतं आहेत.” अशी माहिती कथालेखन स्पर्धा प्रमुख बबनराव गिरी यांनी दिली. 
           पारितोषिक प्राप्त साहित्यिकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र,पुस्तकं व साहित्य संमेलनात सहभाग मिळणार असून उत्तेजनार्थ पारितोषिके रामकृष्ण आघोर,सोलापूर, सुधीर फडके व पी.एन.डफळ, नगर यांना देण्यात येणार आहेत.पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती खजिनदार भगवान राऊत यांनी दिली.
        स्पर्धेचे परीक्षण शाहिर भारत गाडेकर,सुनील धस व शर्मिला गोसावी यांनी केले.पारितोषीक प्राप्त साहित्यिकांचे अध्यक्ष राजेंद्र उदागे,संस्थापक सुनील गोसावी, ज्ञानदेव पांडूळे, प्रा.डॉ.अशोक कानडे, सुभाष सोनवणे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा