पावसासाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना

अहमदनगर - सगळीकडे निर्माण झालेल्या दृष्काळसदृश वातावरणाच्या पार्श्वभूमीवर  शहरातील मुस्लिम बांधवांनी रविवारी पावसासाठी इदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करून ईश्वर अल्लाकडे पावसासाठी प्रार्थना केली. यावेळी राज्यात सर्वत्र पाऊस पडावा, यासाठी अल्लाकडे प्रार्थना करताना म्हटले की, "ईश्वर,अल्लाह समस्त मानव जातीसाठी, पशू- पक्ष्यांकरिता जिथे जिथे पाऊस नाही तेथे फायदा देणारा पाऊस पडू दे.समस्त जातीला त्रास होईल इतकाही त्रास देऊ नको, आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्हा सर्वांना माफ कर, आम्हा सर्वांवर दया कर.आमचे शेतकरी चिंतेत आहे.आम्हाला आणि मुक्या प्राण्यांना पिण्यासाठी पाणी नाही,नफा देणारा भरपूर पाऊस पडू दे, प्रत्येक मनुष्य आकाशाकडे डोळे लावून आहे. पावसाळा सुरू होऊन तीन महिने होत आहेत. हे ईश्वरा समस्त जिवांवर कृपा कर" अशी आर्तपणे प्रार्थना करत असताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले.तसेच भारताची प्रगती आणि देशात शांतता नांदावी यासाठी देखील प्रार्थना करण्यात आली.यावेळी अहमदनगर येथील सर्व मस्जिदचे मौलाना आदींसह हजारो मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशीच प्रार्थना सोमवारी सकाळी 10-30 वाजता आलमगीर येथील इदगाह मैदानावर व मंगळवारी सकाळी 10-30 वाजता सर्जेपुरा येथील तांबोली मस्जिद मध्ये नमाज पठण करुन प्रार्थना केली जाणार आहे. 

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा