१ लाख १३ हजार हिंदूंनीनागरिकत्व का सोडले ? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

लातूर : देशातील १ लाख १३ हजार
हिंदूंनी भारताचे नागरिकत्व का सोडले,याचा शोध सनातन धर्म प्रचारकांनी घ्यावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी लातुरात केले.
सभेत ते म्हणाले, ज्यांनी भारताचे
नागरिकत्व सोडले ते कोणी आदिवासी ओबीसी नाहीत. वर्षभरात लाखावर सवर्ण हिंदूंनी परदेशी नागरिकत्व स्विकारले आहे, त्याचाही शोध आणि बोध घेतला पाहिजे. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही. मात्र, नागरिकत्वाच्या मुद्द्यावर सनातनवाद्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे.
सभेत टोपीवरून अॅड. आंबेडकर
म्हणाले, आता माझ्या डोक्यावरील
टोपीवरून टीका होईल. टोपी
काढल्याने रोजगार मिळणार नाही
आणि घातल्यानेही मिळणार नाही.
आपले प्रश्न समजून घ्या असे ते म्हणाले. 

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा