ताबाखोर विरोधात झोपडपट्टीदादा ची कारवाई करा - गृहमंत्री यांच्याकडे शेख यांची मागणी

अहमदनगर शहरातील उपनगर मध्ये मारवाडी गुजराती समाजातील व्यक्तींच्या जमिनी शोधून त्याच्यावर बेकायदेशीर ताबा मारणारे विरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबत राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन द्वारे सामाजिक कार्यकर्त्यासाठी मागणी केली आहे
अहमदनगर शहरांमध्ये सावेडी उपनगरा व केडगाव उपनगर या भागामध्ये शहराचे प्रमाणावर हद्द वाढ झालेली आहे. या
विकासात बिल्डर व जमिन मालकांचे मोठे योगदान आहे असे असताना सावेडी उपनगरामध्ये
मारवाडी व गुजराथी समाजाचे व्यक्तींचे जमिन पाहुन राजकीय आर्शिवादाने पोहसलेले बेकायदेशीर पणे ताबा मारुण खंडणी मागण्याचा प्रकार करतात पोलीस प्रशासन ही या प्रकारकडे
राजकीय दबावामुळे दुर्लक्ष करीत आहे व पिढीत व्यक्तींना पोलीस कडून योग्य ते सहकार्य मिळत
नसल्याने पोलीसांकडून सदरचा विषय हे दिवाणी स्वरुपाचा असल्याने आम्ही मदत करु शकत नाही
असे उत्तर मिळत असल्याने पिढीत व्यक्ती झालेल्या अन्याया विरोधात उघडपणे दाद मागण्याचे
धाडस करीत नाही. व नाविलाजास्तव जमिन कमी किंमतीत राजकीय मंडळींना विकावे
लागते.नाहितर संबधीत गुंडाना खंडणी देऊन त्याची कोणतीही वाच्यता करता तडजोड करावी
लागते हे ताबे मारणारी टोळी कोणाला तरी कायदेशीर उभे करुन न्यायालयामध्ये खोटे दावे दाखल
करुन सदर जमिनीचे लेटीकेशन तयार करुन ब्लॅकमेलींग करीत आहे. असेच प्रकार केडगांव
उपनगरात व आरणगांव रोड या ठिकाणी सुध्दा राजरोस पणे सुरु आहे. आरणगांव रोड वर काही
पारधी समाजाचे व्यक्ती संघटीत टोळी तयार करुन मोकळया जमिनीवर ताबा मारलेला आहे व
संबधीत भुखंडधारकास सदरचा ताबा सोडण्यासाठी लाखो रुपयांची खंडणी मागण्यात येत आहे.मात्र
या प्रकरणात स्थानिक पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार करुन हि तक्रारकर्त्यास न्याय मिळत नाही
उलट या ताबे मारणा-या च्या टोळीस पाठीशी घालण्यात येत आहे. सदरचा प्रकार अत्यंत गंभीर
स्वरुपाचा असून त्यामुळे करोडो रुपयांची जमिनी खरेदी घेऊन बेकायदेशीर ताबा मारण्याचा
प्रकारामुळे व्यापारी वर्ग भयभीत झालेला आहे. ते जमिनीत गुंतवणुक करण्यास धाडस करीत नाही या
विकासाच्या दृष्टीकोनातुन हानिकारक आहे.
तरी आपणास विनंती करण्यात येते की, वरील प्रकरणाची वरीष्ठ स्तरावरुन सखोल चौकशी
होवून अशी बेकायदेशीर ताबे मारणा-या च्या विरोधात महाराष्ट्र झोपडपटटी गुंड, हातभटटीवाले व
औषधीद्रव्य विषयक गुन्हेगारी, धोकादायक व्यक्ती प्रतिबंध अधिनियम व भारतीय दंड विधानसंहिता
अन्वये गुन्हा दाखल होवून प्रतिबंध करण्यात यावे व त्यांचे राजकीय गॉड फादर यांनाही सहआरोपी
करण्यात यावे.व या गुन्हेगारी पार्श्वभुमी कडे दुर्लक्ष करणारे पोलीस अधिकारी विरोधात
शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शेख यांनी राज्याचे गृहमंत्री. अपर मुख्य गृहसचिव. पोलीस महासंचालक. विशेष पोलीस महानिरीक्षक. पोलीस अधीक्षक यांच्याकडे केलेली आहे

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा