पत्रकारांच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठवणार – आमदार डॉ. किरण लहामटे

पत्रकारांच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठवणार – आमदार डॉ. किरण लहामटे 

पत्रकारांच्या मागण्यांना नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांचा पाठिंबा !

अकोले / प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांना अकोले येथे सादर करण्यात आले. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमदार डॉ. लहामटे यांनी दैनिक समर्थ गांवकरी कार्यालयाला भेट दिली. या भेटीच्या वेळी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी त्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पेढे देऊन स्वागत केले आणि पत्रकारांच्या समस्यांबाबतचे निवेदन त्यांना सादर केले.

*पत्रकारांच्या मागण्या आणि महामंडळ स्थापना:*
पत्रकार संघाने सादर केलेल्या निवेदनात पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापणा लवकरात लवकर करण्याची मागणी केली ती पूर्ण झाली वृत्तपत्र विक्रेत्यांचे महामंडळ झाले तरी अजून २२ मागण्या प्रलंबित असून त्या तातडीने सभागृहात आवाज उठवावा  या महामंडळाद्वारे पत्रकारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा आग्रह आहे. यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांच्या सुरक्षेच्या उपाययोजना, आर्थिक सहकार्य, विमा संरक्षण, तसेच त्यांच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा समावेश आहे.

यावेळी पत्रकार संवाद यात्रेचे माहिती पुस्तकही डॉ. लहामटे यांना सुपूर्त करण्यात आले. पत्रकार संघाच्या या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत डॉ. लहामटे म्हणाले, “पत्रकार समाजाचा महत्त्वाचा घटक आहेत. ते समाजाला योग्य माहिती देण्याचे कार्य करत असतात. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत.” यावेळी डॉक्टर लहाने यांनी राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क करून राज्यातील सर्व प्रश्न पत्रकारांचे सभागृहात मांडणार असा विश्वास दिला

*ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी विशेष योजना:*
या संदर्भात बोलताना आमदार डॉ. किरण लहामटे यांनी पत्रकारांच्या समस्यांवर विधानसभेत आवाज उठवण्याचा आश्वासक शब्द दिला.
राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांसाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन आणि विधानसभेत पत्रकारांचे हक्क, सुरक्षा आणि कल्याणाच्या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणण्याचा निर्धार केला आहे, असे लहामटे म्हणाले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर यशस्वीपणे राबवलेल्या अभियानाचे त्यांनी कौतुक केले. डॉ. लहामटे यांनी पत्रकारांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा दर्शविताना, विशेषत: ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी नवीन योजना तयार करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी “लाडका पत्रकार” नावाची योजना राबविण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्याची ग्वाही दिली. याशिवाय, प्रत्येक ग्रामपंचायत आणि शाळेत वर्तमानपत्र खरेदीसाठी दरमहा दहा हजार रुपयांची तरतूद करण्याची मागणीही त्यांनी मान्य केली.

*पत्रकार सुरक्षेसाठी प्रयत्न:*
डॉ. विश्वासराव आरोटे यांनी पत्रकारांच्या सुरक्षेबाबतच्या अडचणी मांडल्या. त्यांनी पत्रकारांसाठी आर्थिक सहाय्य, जीवन आणि आरोग्य विमा, तसेच पेन्शन योजना लागू करण्याची आवश्यकता स्पष्ट केली. डॉ. लहामटे यांनी या विषयांवर लक्ष केंद्रित करत विधानसभेत पत्रकारांच्या समस्यांसाठी आवाज उठवण्याचे आश्वासन दिले.

*प्रतिनिधींचे समाधान:*
या भेटीवेळी अकोले ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार मैड, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सचिव हरिभाऊ फापाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय आभाळे, तसेच रेडे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत बंदावणे एलआयसीचे सल्लागार जीवन पाडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी आमदार डॉ. लहामटे यांच्या पाठिंब्याबद्दल समाधान व्यक्त केले.

*पत्रकारांच्या हितासाठी पुढील वाटचाल:*
या चर्चेत पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षा आणि त्यांच्या समस्यांवर सखोल चर्चा झाली. पत्रकार संघाच्या मागण्यांना राजकीय स्तरावर पाठिंबा मिळाल्याने भविष्यात पत्रकारांच्या कल्याणासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

अकोले येथे झालेल्या या महत्वपूर्ण चर्चेमुळे पत्रकारांच्या समस्या ऐरणीवर आल्या असून, त्यावर उपाययोजना करण्यासाठी राजकीय स्तरावर हालचाली होणार आहेत. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या पाठिंब्यामुळे पत्रकारांच्या मागण्यांना शासनाकडून लवकरात लवकर प्रतिसाद मिळेल, अशी आशा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने व्यक्त केली आहे.
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा