कोणत्याही नोकरीची सुरुवात आणि सेवापूर्ती हसतमुखाने स्वीकारावी - प्राचार्य के.एल.वाकचौरे

कोणत्याही नोकरीची सुरुवात आणि सेवापूर्ती हसतमुखाने स्वीकारावी - प्राचार्य के.एल.वाकचौरे

राजेंद्र आव्हाड यांनी ३० वर्ष केली 
ज्ञान मंदिरात विद्यार्थ्यांची सेवा 

कोपरगांव / प्रतिनिधी:
 नोकरी स्वीकारली की ती तन-मन-धनाने करावी. प्रत्येक कामामध्ये जर मनुष्याने आनंद शोधला की ते काम खूप सोपे होते.असेच काम राजेंद्र आव्हाड यांनी मागील ३० वर्षात केले असून यामुळेच त्यांनी नोकरी स्वीकारताना हसत स्वीकारले व सेवापूर्ती देखील त्यांनी हसतमुखानेच स्वीकारली आहे असे प्रतिपादन प्राचार्य के एल वाकचौरे यांनी आव्हाड यांच्या सेवापुर्ती सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने केले.
सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे कार्यालयीन अधीक्षक श्री. राजेंद्र खंडेराव आव्हाड यांनी विद्यालयात ३० वर्ष केलेल्या अविरत सेवेचा गुणगौरव म्हणून त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आनंदमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे,उप प्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेशिका प्रज्ञा पहाडे,पल्लवी ससाणे, नंथलीन फर्नांडिस, राम थोरे, शाळेचे जनसंपर्क अधिकारी दत्तात्रय सांगळे यांनी आव्हाड यांचा श्रीफळ,शाल व कला शिक्षक मंगेश गायकवाड यांनी रेखाटली फ्रेम देऊन गौरव करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक धनंजय देवकर, ज्येष्ठ शिक्षक बी के तुरकणे, उपप्राचार्या शुभांगी अमृतकर, दत्तात्रय सांगळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली निकम व कविता चांदन यांनी केले.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा