मातोश्री उर्दू हायस्कूलचा दहावीचा निकाल ९८ टक्के

अहमदनगर - अहमदनगर येथील अलफलाह एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित मातोश्री उर्दू हायस्कूल आलमगीर नागरदेवळे या विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे. एसएससी परीक्षा मार्च-२०२५ च्या परीक्षेत विद्यालयाने ९८ टक्के निकाल प्राप्त केला आहे. एसएससी परीक्षेस विद्यालयातून ४३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. शाळेतील विद्यार्थिनी खान बुशरा फिरोज हिने ८६.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर शेख हुमेरा एजाज हिने ७६ टक्के, सय्यद सफिना रियाज हिने ७५.२० टक्के गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक प्राप्त केला.
यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ.शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज, मुख्याध्यापक शेख जमीर अहमद इस्माईल तसेच वर्गशिक्षिका खान सफिया सलीम, शेख महेनाज़ अ. सलाम, शेख एजाज अहमद अ. कुडूस, शेख अंजुम सत्तार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शेख अ. हसीब अ. सलाम, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व शिक्षक-पालक संघाचे सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर यांच्यासह ग्रामस्थ पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा