जि.प.प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेला पालकांनी दिली दुचाकी सप्रेम भेट

अकोले / प्रतिनिधी:
अहिल्यानगर जिल्ह्यच्या अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सुमन गणपत खतोडे यांचा पालकांच्या वतीने गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी व पालक यांच्या वतीने शिक्षिकेला स्कूटी दुचाकी वाहन सप्रेम भेट म्हणून देण्यात आली.
      अकोले येथे आयोजित सदरील कार्यक्रम तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचे हस्ते व राजूर महाविद्यालय चे माजी प्राचार्य विलास नवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष श्री के.डी. धुमाळ, गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, अकोले शिक्षण विस्तार अधिकारी माधवराव हासे, शिक्षण विस्तार अधिकारी मवेशी, बीट बाळासाहेब दोरगे, केंद्रप्रमुख नवलेवाडी सुनील नरसाळे, शिक्षक श्री. विक्रम गायकर आदि उपस्थितीत होते .
इयत्ता चौथीचे सर्व विद्यार्थी व पालक आणि शिक्षक वृंद नवलेवाडी यांच्यावतीने  गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
       नवलेवाडी शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षका श्रीमती सुमन गणपत खतोडे यांच्या शिकवण्याच्या अनोख्या पद्धतीने व विध्यार्थ्यांना आपलेसे करण्याने तसेच त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाने व मेहनतीने इयत्ता चौथीतील सर्व मुलांनी जिल्हास्तर व राज्यस्तरावर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये नाविन्यपूर्ण यश मिळविले. अनेक विध्यार्थी यशाचे मानकरी ठरले त्यामुळे सर्व पालकांनी त्यांना ज्युपिटर स्कूटी दुचाकी वाहन सप्रेम भेट दिली.
          आमदार डॉ. किरण लहामटे यांनी या विध्यार्थी प्रिय शिक्षकेचे कौतुक करत चांगले कामे केल्यास  पालक देखील शिक्षकांचा गौरव करतात हे त्याचे अनोखे उदाहरण असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता सहाणे यांनी केले तर सत्कारमूर्तींचे परिचय ओळख कविता आरोटे  यांनी करुन दिला,तसेच आलेल्या पाहुण्यांचा सत्कार सोहळा डॉ. निलेश सहाणे यांनी केला, विद्यार्थी  व पालकांचे मनोगत झाले. 
शेवटी आभार श्री महेश शेटे सर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन वाकचौरे, सचिन पापळ, अमोल वाकचौरे, संतोष कडलग आदी पालकांनी विशेष सहकार्य केले.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे - अकोले 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा