श्रीरामपूर - क.जे.सोमैया हायस्कूल मध्ये डॉ.जोस्त्ना तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
हिंद सेवा मंडळाच्या क.जे. सोमैया हायस्कूलमध्ये १ मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्रीरामपूर येथील प्रसिद्ध डॉक्टर जोस्त्ना तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यालयाचे विद्यमान चेअरमन रणजीत श्रीगोड, शंभूक विद्यार्थी वस्तीगृहाचे अधिक्षक अशोक दिवे, प्रशासनाधिकारी भि.का. कांबळे, शालेय समिती सदस्य सुर्यकांत कर्नावट, मुख्याध्यापक भुषण गोपाळे, डॉ. बा.ग. कल्याणकर रात्र प्रशालेचे मुख्याध्यापक दत्तात्रय कांबळे, विद्यालयाचे पर्यवेक्षक कल्याण लकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.तांबे यांनी विद्यालयातील सर्व यशस्वी, गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.
याप्रसंगी  विद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोाड यांनी आपल्या मनोगतामध्ये संयुक्त महाराष्ट्र  चळवळीच्या आठवणींना उजळा दिला व जागतिक कामगार दिनाचे महत्त्व विशद केले.
शंभूक  विद्यार्थी वस्तीगृहाचे अधिक्षक दिवे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये महाराष्ट्र संतांची भूमी आहे.  तसेच एक मे महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले व महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या विद्यर्थांना शुभेच्छा दिल्या.
 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अविनाश राऊत, सूत्रसंचालन कुलभूषण धोंडलकर , संकेत गंधे यांनी केले. या कार्यक्रमास , शिक्षण प्रेमी नागरिक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व अध्यापक सेवक वृंद आदि प्रयत्नशील होते. 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर -9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा