शिल्पकार बालाजी वल्लाल यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरव

अहमदनगर - स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने हॉटेल रेडीयन्स येथे महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ सोहळा संपन्न झाला. यामध्ये शिल्पकार बालाजी भैरवनाथ वल्लाल  यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदर्श शिल्पकार पुरस्कार देण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्रामभैय्या जगताप, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, शिल्पकार प्रमोद कांबळे,मारुतीराव मिसळवालेचे संचालक अमित खामकर,स्नेहबंधचे संस्थापक डॉ.उद्धव शिंदे आदी मान्यवर उपस्थितीत होते. बालाजी वल्लाल यांना त्यांच्या शिल्पकलेसाठी यापूर्वीही अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 
विविध क्षेत्रात समाजहिताचे उल्लेखनीय काम करत असलेल्यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी स्नेहबंधच्या वतीने कला, क्रीडा, शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक या क्षेत्रातील मान्यवरांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार शिल्पकार बालाजी वल्लाल यांना मिळाल्याबद्दल त्यांचे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातून कौतुक होत आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा