आरबीएनबीचे उप प्राचार्य डॉ.अमरनाथ जगदाळे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न !

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर येथील राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयातील उप प्राचार्य (विज्ञान विभाग) डॉ. अमरनाथ जगदाळे हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. या महाविद्यालयात त्यांनी आठ वर्षे उत्तम प्रकारे सेवा केली आहे.यासोबतच त्यांनी आपल्या अंधश्रद्धा निवारण कार्यातून चांगले विद्यार्थी घडविले आहेत.
आर.बी.एन.बी. महाविद्यालयाच्यावतीने 
नुकताच त्यांचा सेवापूर्ती सोहळा बोरावके महविद्यालयातील सेमिनार हॉल मध्ये संपन्न झाला.
या समारंभास रयत शिक्षण संस्था कौन्सिल सदस्या (प्रमुख:  रयत शैक्षणिक संकूल श्रीरामपूर) मा. मीनाताई जगधने,माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, डॉ. राजीव शिंदे, प्राचार्य डॉ.मुकुंद पोंधे, प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर, किशोर पाटील, डॉ. निशांत जगदाळे, डॉ. मैथिली जगदाळे, डॉ. शरद शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. 
उपस्थित सर्वांनी डॉ. अमरनाथ जगदाळे यांना सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी सपत्नीक पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. रयत शैक्षणिक संकूलाच्यावतीने रयत शैक्षणिक संकुल प्रमुख मा.मीनाताई जगधने व माजी नगराध्य्क्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सन्मान / सत्कार करण्यात येवून पुढील भावी जीवनाच्या उत्तम आरोग्यदायी जीवन आणी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.मीनाताई जगधने ह्या होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक प्राचार्य डॉ.प्रवीण बडधे,यांनी केले.

यावेळी अनेक मान्यवर व स्नेही,आप्तेष्ठ परिवार यांनी डॉ.जगदाळे यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
सूत्र संचालन डॉ.योगिता रांधवणे, डॉ.प्रियांका शितोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.अनुप दळवी यांनी केले.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा