लोकशाही पद्धतीने विद्यार्थ्यांनी केली वर्ग मंत्रिमंडळाची निवड

अजीजभाई शेख / राहाता 
निवडणूक प्रक्रिया काय असते, मतदान केंद्र, ईव्हीएम मशीन, मतदान अधिकारी यांच्या समवेत मतदान कसे करावे आदींचे धडे तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालय व कन्या विद्यालयात नुकतेच वर्गनिहाय विद्यार्थ्यांना देण्यात आले. 
लोकशाही पद्धतीने होणारी प्रत्यक्षातली निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांना अनुभवण्यास मिळाली. या निवडणूक प्रक्रियेतून कन्या व मुले विभागातील प्रत्येक वर्गाचे वर्ग मंत्रिमंडळ या निवडणुकीतून तयार करण्यात आली. शिक्षकांच्या संकल्पनेतून शालेय वर्ग मंत्री मंडळाची निवडणूक घेण्याचे नियोजन केले. यासाठी ॲपच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन तयार करून प्रत्यक्षात डिजिटल बोर्ड तयार केले. इच्छुक उमेदवारांची घोषणा झाली. उमेदवारांना चिन्हही देण्यात आली. विद्यार्थ्यांना ईव्हीएम मशीनवर मतदान कसे करायचे याचे धडे वर्गातून इंटरॲक्टिव्ह बोर्डवर देण्यात आली. विद्यार्थ्यांना मॉकपोल दाखवून अधिकारी एक-दोन-तीन व केंद्राध्यक्ष यांच्या उपस्थित मतदान गोपनीय पद्धतीने करून घेण्यात आले. अधिकाऱ्यांचे कामकाज काय असते याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. बॅलेट बटन दाबताच पसंतीच्या उमेदवारापुढील बटन दाबल्यावर हिरवा लाईट लागतो व विशिष्ट आवाज येतो. ही प्रक्रिया अनुभवताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसत होते. याशिवाय मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता आणि प्रत्यक्षातला अनुभव घेऊन विद्यार्थी भारावून गेले. कन्या विद्यालयात मुख्याध्यापिका नलिनी जाधव, माधुरी वडघुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया आनंददायी आणि उत्साहात पार पडली. यावेळी सर्व वर्गशिक्षकांनी निवडणूक अधिकारी म्हणून उत्तम कर्तव्य बजावले. ही प्रक्रिया राबविण्यामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी विलास गभाले यांनी विशेष परिश्रम घेतले. मुले विभागात ही प्रक्रिया मुख्याध्यापक विनायक मेथवडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, डॉ. शरद दुधाट, संजय ठाकरे, रेणुका वरपे, प्रियंका भालेराव, शुभांगी भरसाकळ, बाबासाहेब अंत्रे याशिवाय वर्गशिक्षक उपस्थित होते. मुख्याध्यापक विनायक मेथवडे यांनी सांगितले, की आधुनिक पद्धतीचा वापर करून लहानपणापासून लोकशाहीचे धडे दिले तर विद्यार्थी जागरूक नागरिक तयार होतील. निवडणूक प्रक्रिया ईव्हीएम मशीनद्वारे विद्यार्थ्यांना अनुभवताना त्यांच्यातील उत्सुकता आणि चेहऱ्यावरील आनंद हेच या प्रक्रियेचे फलित असल्याचे मत व्यक्त त्यांनी केले. ही प्रक्रिया राबविण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अश्विनी सोहनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

*वृत्त विशेष सहयोग*
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा