महात्मा गांधी विद्यालयात वृक्षारोपण

अजीजभाई शेख / राहाता 
तालुक्यातील प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पंचायत समिती राहाता यांच्या वतीने अमृत वृक्ष योजने अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. 
पंचायत समितीचे बाभळेश्वर येथील केंद्रप्रमुख कानिफनाथ कोळेकर यांनी नुकतीच विद्यालय भेट दिली. त्यावेळी शासनाच्या अमृत वृक्ष योजनेअंतर्गत विद्यालयात केंद्रप्रमुख कानिफनाथ कोळेकर आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक मेथवडे यांच्या हस्ते बदाम, लिंब, आवळा, चिंच, पिंपळ, वड आदी ३० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बाभळेश्वर प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक दत्तात्रय कोरडे, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, डॉ. शरद दुधाट, नरेंद्र ठाकरे, संजय ठाकरे, संपतराव बगाड, रवींद्रनाथ मेढे, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*वृत्त विशेष सहयोग*
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा