श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
देशाची एकता आणि अखंडता जपण्यासाठी भारत हा विविध धर्म भाषा आणि परंपरांनी भरलेला देश आहे या विविधतेतून एकतेचा संदेश टिकून ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे, राष्ट्रीय एकता दिवस साजरा करून नागरिकांना एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना रूढ करण्याचा या पाठीमागील उद्देश आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांची आठवण ठेवण्यासाठी ३१ ऑक्टोबर हा भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयंती दिवस आहे त्यांनी भारतातील ५६२ संस्थानांना एकत्र करून भारताला अखंड राष्ट्र बनवले त्यांच्या या महान कार्याच्या स्मरणार्थ राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो, राष्ट्रीय ऐक्याची जाणीव निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करून देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय भावना, परस्पर विश्वास आणि सहकार्य याचा संदेश दिला जातो. विविध प्रांतातील लोकांमध्ये एकमेकाबद्दल आदर निर्माण व्हावा हा उद्देश असतो तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी सरदार पटेल यांच्या दृढ निश्चय , देशप्रेम आणि कार्य तत्परतेचा आदर्श तरुण पिढी समोर ठेवून त्यांना प्रोत्साहित केले जाते, राष्ट्रीय एकता दिवसाचा संदेश "एकता हीच भारताची खरी ताकद" आहे सरदार पटेल यांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रत्येक भारतीयाने देशाच्या अखंडतेसाठी आपले योगदान द्यावे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे त्या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी "एकता दौड" म्हणजे (रन फॉर युनिटी) हा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भंवर, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, आजी- माजी सैनिक संघटनेचे मेजर कृष्णा सरदार, मेजर बाळासाहेब बनकर, मेजर संग्राम यादव ,मेजर अशोक कायगुडे ,मेजर राजेंद्र आढाव, युनायटेड इंडिया इन्शुरन्स तथा परिवर्तन फाउंडेशन चे गोरख आढाव तसेच श्रीरामपूर मधील शासकीय ,राजकीय , शैक्षणिक, सामाजिक संघटना, मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

*वृत्त विशेष सहयोग*
मेजर कृष्णा सरदार - श्रीरामपूर 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा