उपअभियंता शिंदे यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न--------------------------------------------------------पाटबंधारे खात्यातील प्रामाणिक कामातून उप अभियंता वसंतराव शिंदे यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली - आमदार कानडे

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - येथील वडाळा पाटबंधारे उपविभागाच्या उपविभागीय अभियंता पदावरून सेवानिवृत्त झालेले वसंतराव दशरथ शिंदे यांनी आपल्या ३९ वर्षाच्या शासकीय सेवेत अत्यंत प्रामाणिक राहून शेतकरी आणि ग्रामीण समाजाच्या हिताची कामे स्वच्छ मनाने केली,पाटबंधारे खात्याला त्यांनी आपल्या प्रामाणिक वागण्याने प्रतिष्ठा मिळवून दिली, हा आदर्श सर्व अधिकाऱ्यांनी जपला पाहिजे असे मत आमदार लहू कानडे  यांनी व्यक्त केले. येथील स्वयंवर मंगलकार्यालयात श्रीरामपूर येथील वडाळा पाटबंधारे उप विभागातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले उपविभागीय अधिकारी वसंतराव दशरथ शिंदे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार लहू कानडे  बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे,सभापती डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे, माऊली मुरकुटे,सिद्धार्थ मुरकुटे,सचिन गुजर, करण ससाणे, सुभाष फरगडे,विकास शिंदे, सुनील जगताप, बबनराव मुठे,अरुण पाटील नाईक,तहसीलदार प्रशांत पाटील, पत्रकार बाळासाहेब तनपुरे, साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये,किशोर गाढे,भाऊसाहेब डोळस, सुभाष शिंदे, अशोक थोरे, योगेश जोर्वेकर, प्रीतम शेवाळे, राजेंद्र पावटेकर,रामनाथ सातपुते,अहिलाजी खैरे, प्रदीप अभंग, संजय भागवत,सुधाकर कासार,राकेश शिवदे,बाळासाहेब नाईक, सुरेश ताके, सरपंच आबासाहेब गवारे, ज्ञानदेव साळुंखे,अशोक पवार, भगीरथ जाधव,भाऊसाहेब गलांडे आदी मान्यवर उपस्थित होते. भगवानराव शिंदे यांनी सर्व मान्यवरांचे बुके, शाल देऊन स्वागत, सत्कार केला.आमदार लहू कानडे  यांनी आपल्या मनोगतात पुढे सांगितले की, पाटबंधारे  खात्यातील ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा पुढील काळातही देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा असे आवाहन केले,.माजी आमदार भानुदास मुरकुटे हे आपल्या भाषणात म्हणाले, वसंतराव शिंदे यांनी ग्रामीण भागात,शेतकरी वर्गात स्वतःची प्रामाणिक प्रतिमा तयार केली. शेती, शेतकरी आणि पाणी यांचे नाते जवळचे आहे, वसंतराव शिंदे यांनी पाटबंधारे खात्यातील कार्याने आदर्श निर्माण केला असे सांगून आपले पुढील जीवन काही चांगल्या कामातून निरंतर चालू ठेवावे त्यासाठी आपण सहकार्य करू असे आश्वासन दिले. सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी वसंतराव शिंदे यांनी आमच्या इंदिरानगर परिसरात जसा आपुलकीचा मित्रपरिवार निर्माण केला तसाच प्रामाणिक कामातून सर्वत्र जिव्हाळा पेरला आहे, त्यांचा सर्वच परिवार आदर्श असल्याचे सांगितले. भाजपचे बबनराव मुठे म्हणाले, वसंतराव शिंदे यांना ग्रामीण आणि शहरी भागात मोठा सन्मान निर्माण आहे, त्यांच्यासारखे शेतकरी हिताचे अनुभवी अधिकारी राजकारणात आले तर ते अधिक उपयुक्त होईल, त्यांनी भाजपात काम करावे ते नक्कीच आमदार होतील अशा भावना व्यक्त केल्या. मुळा प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे यांनी सांगितले की, वसंतराव शिंदे यांच्यासारखे अधिकारी हे जनमनात आदराचे स्थान निर्माण करतात त्यांना यापुढील जीवनवाटचालीतही सहकार्य करू असे आश्वासन दिले.तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले की, शिंदे यांनी पाटबंधारे खात्याचा नावलौकिक वाढविला. साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी मित्रवर्य वसंतराव शिंदे यांच्या        उंदीरगावातील अनेक आठवणी सांगून एका आदर्श मित्राचा आपणास सार्थ अभिमान आहे, त्यांनी सेवानिवृत्तीनंतर 'वसंतपालवी 'आत्मचरित्रपर लेखन करावे आणि पुढील पिढीला आपला आदर्श सांगावा ही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पत्रकार बाळासाहेब तनपुरे, पाटबंधारे खात्यातील अधिकारी, कुटुंबातील सौ.मनीषा निखिल वेताळ,सौ.शिल्पा अभिजित आगवणे यांनी  मनोगत व्यक्त केले. वसंतराव शिंदे यांनी आपल्या जीवनवाटचालीतील प्रसंग सांगून ८१ गावातील लोकांचा सहवास आणि सात आमदाराचे चांगल्या कामासाठी पाठींबा लाभला,त्यामध्ये  आ. राधाकृष्ण विखे पाटील, आ. गोविंदराव आदिक,आ.भानुदास मुरकुटे,आ.बाळासाहेब मुरकुटे, आ.जयंतराव ससाणे,आ. भाऊसाहेब कांबळे, आ.लहू कानडे यांचे मौलिक मार्गदर्शन, सहकार्य लाभल्यामुळे आपणास चांगले काम करता आले,असे सांगून आपल्या सेवापूर्तीनिमित्त मोठा मित्रपरिवार, स्नेहीजण उपस्थित राहून त्यांनी सन्मान केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन कवयित्री सौ.संगीता अशोकराव कटारे / फासाटे यांनी केले.निखिल रामदास वेताळ यांनी आभार मानले.या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा