महात्मा फुले कृषी विद्यापीठात राष्ट्रीय सहज कृषी कार्यशाळा संपन्न; राज्यभरातील १६० सहजयोग्यांचा सहभाग !


मख़दूम समाचार
राहुरी (प्रतिनिधी)  २९.६.२०२३
    नवी दिल्ली येथील प. पू. माताजी श्री निर्मला देवी सहजयोग ट्रस्ट यांच्याकडून राष्ट्रीय सहज कृषी अभियानांतर्गत रिजनल सहज कृषी सेमिनारची सुरुवात प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांचे प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सहज कृषी समन्वयक महेश आव्हाड, जिल्हा समन्वयक  श्रीनिवास बोज्जा, नारायण निबे, बाळासाहेब शेवाळे, देविदास बागुल, मंगेश सातोस्कर, हनुमंथ रायुडू, दिलीप सिंह, विरेश हल्लूर, शांतीलाल पटेल, सोमनाथ कुंबळे व दत्तू लगड यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
    दोन दिवस महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी शिबीर आयोजित करण्यात आले. सेमिनारद्वारे श्री माताजींनी सांगितल्याप्रमाणे सहज कृषीचे तंत्रज्ञान, महत्त्व व फायदे याबद्दल माहिती दिली. तसेच आलेल्या तज्ञांनी शेती, पशुपालन याविषयांवर मार्गदर्शन केले. कृषी विद्यापीठातील हवामान अद्यावत शेती, जल व्यवस्थापनचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र यांच्याकडून वरिष्ठ संशोधन सहाय्यक शुभांगी घाडगे यांनी कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान व त्याचा वापर याविषयी मार्गदर्शन केले.
     ग्रामीण भागात सहजयोग व सहजकृषि प्रचार प्रसारासाठी करावयाच्या योजनांविषयी पंजाबराव बिहाडे यांनी मार्गदर्शन केले. शांतीलाल पटेल व सोमनाथ कुंबळे यांनी सहज कृषिविषयी मार्गदर्शन केले. सेमिनारमध्ये शेतकरी व त्यांचे शेतीसंबंधी असलेले प्रश्न व त्यावरील उपाय योजना यावर चर्चासत्र झाले. 
      आजच्या आधुनिक शेतीला सहज कृषीची (आध्यात्मिक शेतीची) जर जोड दिली तर शेतकऱ्यांचे जीवन कसे सुखकारक होऊ शकते यासंबंधी प्रादेशिक सहज कृषी समन्वयक नारायण निबे यांनी माहिती दिली. सहजयोग्यांना कृषी विद्यापीठातील महत्त्वाची ठिकाणे व सहज कृषीचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. 
      कार्यक्रमात अहमदनगर सहजयोग युवाशक्ती यांच्याकडून भरतनाट्यम व भजन संध्या सादर करण्यात आली. सेमिनारचा भारतातील इतर राज्यातून व महाराष्ट्रातून आलेल्या १६० सहजयोग्यांनी लाभ घेतला. सेमिनार यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सहजकृषी समन्वयक महेश आव्हाड व जिल्हा सहजयोग समन्वयक श्रीनिवास बोज्जा यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेस सहजयोगी विनाताई बोज्जा, नामदेव रहाणे,  बाळासाहेब ताकटे, बबन धोंडे, कर्णा तुवर, चंद्रशेखर सोनावणे, बाळासाहेब शेवाळे, देविदास बागुल, कळसे, मंगेश सातोस्कर, चेतन कानडे, अनंत रोहकले, विठ्ठल राठोड,  प्रशांत राजवाळ, हनुमंथ रायुडू, दिलीप सिंह, विरेश हल्लूर, राजू दावनपल्ली, मोहन रच्चा आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा