मख़दूम समाचार
१९.८.२०२३
समकालीन प्रकाशनाचे नवे पुस्तके नुकतेच बाजारात आले आहे. 'देश सुटतो तेंव्हा' या नावाने प्रीती छत्रे यांनी लिहलेले आहे.
गेल्या दशकात अनेक देशांमध्ये गृहयुद्धं भडकली; गावांवर, शहरांवर बॉम्बहल्ले झाले. तर कुठे भीषण नैसर्गिक संकटे आली. तिथल्या माणसांना जीव वाचवण्यासाठी अंगावरच्या कपड्यांनिशी देश सोडावा लागला आणि मग सुरू झाले एक नष्टचर्य.
तापलेल्या वाळवंटातून, हाडं गोठवणाऱ्या थंडीतून, दाट जंगलांतून, खवळलेल्या समुद्रातून माणसे जिवाच्या आकांताने निघाली. वाटेत किती मेली, परागंदा झाली याची गणतीच नव्हती. उरलेल्यांच्या वाट्याला रेफ्युजी कॅम्प्समधले किडा-मुंगीचे जिणे आले.
आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतले लाखो लोक असे देशोधडीला लागले. या गोष्टी आहेत त्यांच्या ससेहोलपटीच्या. आपल्याला आणि आपल्या मुलाबाळांना सुरक्षित जगता यावे या साध्या इच्छेपोटी माणसाने सोसलेल्या अनन्वित हालअपेष्टांच्या, टोकाच्या परिस्थितीतही तग धरून राहण्याच्या आणि त्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी धडपडणाऱ्यांच्या सुद्धा.
विश्वाला व्यापून असलेल्या रेफ्युजी प्रश्नाचा मानवी चेहरा समोर आणणारे हे पुस्तक असून नक्कीच वाचले पाहिजे.
• पुस्तकाची मूळ किंमत - २०० रु/-
• सवलत किंमत - १६० रु/- (फ्री घरपोच)
• पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क - 9370979287
Post a Comment