एशियन गेम्समध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे पदक निश्चित; उपांत्य फेरीत बांगलादेशाचा आठ गडी राखून पराभव !



मख़दूम समाचार 
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) २४.९.२०२३
    आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला किमान रौप्य पदक निश्चित आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने दोन गडी गमावून ५२ धावा केल्या.
    बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव करत भारताने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. या विजयासह भारतीय संघाने किमान रौप्य पदक निश्चित केले आहे. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने १७.५ षटकांत सर्व गडी गमावून ५१ धावा केल्या. केवळ कर्णधार निगार सुलतानाला दुहेरी आकडा पार करता आला. तीने १२ धावा केल्या होत्या. भारताकडून पूजा वस्त्राकरने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. भारताने ८.२ षटकात दोन गडी गमावून ५२ धावा केल्या आणि लक्ष्य गाठले. भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने १५ चेंडूत सर्वाधिक नाबाद २० धावा केल्या. शेफालीने १७ धावांचे योगदान दिले. आता अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना पाकिस्तान किंवा श्रीलंकेशी होणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा