श्रीलंकेला ४१ धावांनी हरवत भारताने गाठली अंतिम फेरी


मख़दूम समाचार 
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) १३.९.२०२३
आशिया कपच्या सुपर-४ सामन्यात भारताने श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. प्रथम खेळताना भारतीय संघ २१३ धावा करून बाद झाला. प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंकेचा संघही १७२ धावांवर बाद झाला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. यानंतर गिल १९ धावा करून बाद झाला आणि ही भागीदारी तुटली. रोहित शर्माने तुफानी शैलीत खेळत ४८ चेंडूत ५३ धावा केल्या आणि १० हजार एकदिवसीय धावाही पूर्ण केल्या. कोहली ३ धावा करून बाद झाला. इशान किशनने ३३ आणि केएल राहुलने ३९ धावा केल्या.  खालच्या फळीकडून अक्षर पटेलने २६ धावा केल्या आणि टीम इंडिया २१३ धावांवर बाद झाली. श्रीलंकेसाठी वेलालगेने ४० धावांत एकूण ५ बळी घेतले. त्याच्याशिवाय चरित असलंकानेही ४ बळी घेतले. महिष तिक्ष्णालाही एक विकेट मिळाली.

प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंकेची अवस्थाही बिकट होती. सलामीवीर निसांका ६ धावा करून आणि करुणारत्ने २ धावा करून बाद झाला.  त्याच्यापाठोपाठ कुसल मेंडिसही १५ धावांवर बाद झाला. यानंतर समरविक्रम १७ धावा आणि अस्लंका २२ धावा करून कुलदीप यादवचा बळी ठरला. शनाकाला बाद करून रवींद्र जडेजाने श्रीलंकेला सहावा धक्का दिला. धनंजय डी सिल्वाने एक बाजू लावून धरली. त्याने वेलालगेसह अर्धशतकी भागीदारी करून संघाच्या विजयाच्या आशा उंचावल्या. जडेजाने डी सिल्वाला बाद करून ही भागीदारी भेदली. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी १ बळी मिळाल्याने श्रीलंकेची धावसंख्या ९ गडी बाद १७२ अशी झाली. या धावसंख्येवर कुलदीपने आणखी एक विकेट घेत श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला. कुलदीपने ४ बळी घेतले. बुमराहला २ बळी मिळाले.

श्रीलंकेसाठी ४० धावांत ५ बळी घेणार्‍या दुनिथ वेलालगेला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

भारताचा सुपर-४ चा शेवटचा सामना बांगलादेश विरुद्ध १५ सप्टेंबर रोजी होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा