बालसंगोपन योजनेचा आढावा घ्या,आयुक्तांना निवेदन - मिलिंदकुमार साळवे यांची मागणी

पुणे / श्रीरामपूर - प्रतिनिधी:
 पन्नास वर्षे पूर्ण करून सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेची हजारो प्रकरणे व लाखभर बालकांचे अनुदान कोट्यवधींचा निधी उपलब्ध असूनही रखडले आहे. त्यामुळे या योजनेचा राज्य पातळीवर जिल्हानिहाय आढावा घेऊन गती दयावी, अशी मागणी मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य व महाराष्ट्र साऊ एकल महिला समितीचे राज्य समन्वयक मिलिंदकुमार साळवे यांनी राज्याच्या महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांच्याकडे केली आहे.
 साळवे यांनी पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयात आयुक्तांची भेट घेऊन याबाबत निवेदन देऊन योजनेच्या अंमलबजावणीतील समस्यांकडे लक्ष वेधले.
राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागांतर्गत पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयामार्फत गेल्या पन्नास वर्षांपासून ही योजना राबविण्यात येत आहे. कोरोनामध्ये तसेच विविध आजार व दुर्घटनांमध्ये आई, वडील अथवा दोन्ही पालक गमावलेल्या एकल, अनाथ बालकांच्या शिक्षण व संगोपनासाठी ही योजना राबविली जाते. त्यानुसार अशा पात्र लाभार्थी बालकांना दरमहा २ हजार २५० रू. अनुदान दिले जात आहे. तर कोरोनामध्ये पालक गमावलेल्या बालकांना केंद्र सरकारच्या प्रायोजित योजनेंतर्गत दरमहा ४ हजार रू. लाभ दिला जात आहे. केंद्र व राज्य सरकारकडून दोन्ही योजनांसाठी दरवर्षी तीनशे ते चारशे कोटी रू. निधी उपलब्ध करून दिला जात आहे. पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तत्परतेने राबविणाऱ्या महिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत बालसंगोपन योजनेच्या प्रस्ताव मंजुरी व निधी वाटपात मोठा गोंधळ आहे. प्रस्ताव मंजूर असूनही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एक, दोन वर्षे अनुदान जमा होत नाही. प्रस्ताव दाखल केले तर दीड, दोन वर्षे लाभार्थ्यांना आपण दाखल केलेल्या प्रस्तावाचे काय झाले?हेच कळत नाही. त्यामुळे या सर्व गोंधळाची चौकशी करून योजनेचा जिल्हा निहाय आढावा घ्यावा, तातडीने प्रलंबित प्रस्ताव निकाली काढून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात देय संपूर्ण कालावधीचे अनुदान डी.बी.टी.द्वारे वर्ग करावे, अशी मागणी मिलिंदकुमार साळवे यांनी महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांची आयुक्तालयात समक्ष भेट घेऊन केली आहे.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा