रयतच्या शिक्षकांनी गुणवत्ता सिद्ध करावी - नवनाथ बोडखे

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
रयत शिक्षण संस्थेत ज्यूनिअर कॉलेज शिक्षकांनी आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर कला आणि वाणिज्य शाखातील शिक्षकांनी आपल्या विभागातील विद्यार्थ्यांची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ घडवून आणावी. विद्यार्थ्यांना कौशल्यांवर आधारित शिक्षण देऊन शिक्षकांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे मत रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी केले व्यक्त केले. 
अहिल्यानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय कार्यालयात ज्यूनिअर कॉलेज गुणवत्ता विकास कक्षाच्यावतीने कला व वाणिज्य शाखातील शिक्षकांचे एक दिवसीय प्रबोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रबोधन वर्गाचे अध्यक्ष विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांनी केले. त्यांनी सांगितले की कला कौशल्यातून विद्यार्थ्यांच्या मनात आवड निर्माण करून विद्यार्थ्यांची संख्या व निकाल वाढविणे शक्य आहे. 
यावेळी व्यासपीठावर संदीप शिंदे, श्रीकांत थोरात हे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. शरद दुधाट, प्रमोद राऊत यांनी शिक्षकांना विविध सहशालेय व शालेय उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले. गुणवत्ता विकास कक्ष मार्गदर्शक काकासाहेब वाळुंजकर यांनी विद्यार्थी संख्येचे गांभीर्य लक्षात आणून देत विद्यार्थी संख्या व गुणवत्ता वाढविण्याची उपाययोजना सुचविली.

           नवनाथ बोडखे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, ज्यूनियर कॉलेज हा दुर्लक्षित विभाग असून या विभागावर गुणवत्ता आणि संख्या वाढीच्या बाबतीत लक्ष केंद्रित केले जात आहे. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी अंग झटकून काम करावे आणि आपली गुणवत्ता सिद्ध करून अस्तित्व टिकवावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी विभागातील नगर, नाशिक, बीड जिल्ह्यातील असंख्य शिक्षक या प्रबोधन वर्गास उपस्थित होते. या प्रबोधन वर्गाचे शेवटी आरडे सर यांनी आभार मानले.

*वृत्त विशेष सहयोग*
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा