एसएमपी इंटेरियर डिझाईन असोसिएट ऑफिसचे उद्घाटन संपन्न

नगर  - शहरातील एसएमपी इंटरियर डिझाईन असोसिएट ऑफिसचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडले. या व्यवसायात तब्बल आठ वर्षांपासून कार्यरत असलेले संचालक सईद पठाण यांनी आता पर्यंत अनेक बंगले, फ्लॅट्स, हॉटेल्स, मंगल कार्यालये तसेच विविध वास्तूंचे आकर्षक डिझाईन करून यश मिळवले आहे.
उद्घाटन सोहळा सईद पठाण यांच्या मातोश्रींच्या शुभहस्ते रिबीन कापून संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सईद पठाण यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करुन भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोतवाली पोलिस स्टेशनचे निरीक्षक श्री.दराडे, उपजिल्हाधिकारी सय्यद वसीम,हाजी करीमशेठ हुंडेकरी, एन आर लाॅनचे हाजी नजीर अहमद,न्यु मॉडर्न कन्सट्रक्शनचे इकबाल सय्यद,केअर एन क्युअर हॉस्पिटलचे डॉ. सईद शेख, कॉन्ट्रॅक्टर चांद शेख, अब्दुल सलाम भाई,सय्यद परवेज, मदरसा आलमगीरचे हाफीज हाजी रीयाज, कॉन्ट्रॅक्टर उस्मान इनामदार, कॉन्ट्रॅक्टर रफिक भाई, फिरोज जहागीरदार, कवीजंग लॉनचे वसीम भाई, हाजी मिर्झा,अर्शद भाई, मतीन भाई तसेच या सोहळ्यास बांधकाम क्षेत्रातील इंजिनीयर, आर्किटेक्ट, कांन्ट्रॅक्टर, डॉक्टर, नगरसेवक, पत्रकार व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
यावेळी केअर एन क्युअर हॉस्पिटल चे डॉ.सईद शेख म्हणाले की, आजच्या युगात इंटेरियर डिझाईन ही केवळ सजावट नसून ती जीवनशैली बदलणारी संकल्पना ठरते. सईद पठाण यांनी या क्षेत्रात केलेले काम प्रेरणादायी असून पुढेही समाजाला उत्कृष्ट सेवा मिळेल याची खात्री आहे असे नमुद केले.  उपस्थितांचे मतीन भाई व अर्शद भाई यांनी आभार मानले. आणि समाजास उत्तम व दर्जेदार डिझाईन सेवा पुरविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा