रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल तर्फे सीक्यूएव्ही अहिल्यानगर येथे ५००० वृक्षारोपण

नगर -रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल यांच्यावतीने पर्यावरण संवर्धना साठी भव्य उपक्रम राबविण्यात आला. १ ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सीक्यूएव्ही (सेंट्रल क्वालिटी अ‍ॅश्युरन्स-व्हेईकल्स) अहिल्यानगर येथे तब्बल ५००० सीताफळाची रोपे लावण्यात आली.
या प्रकल्पाचे उद्घाटन सीक्यूएव्हीचे प्रमुख ब्रिगेडियर राजीव चावला सर यांच्या हस्ते झाले. १२५ एकर विस्तीर्ण परिसरात केलेले हे वृक्षारोपण खरोखरच एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले. आपल्या मनोगतात ब्रिगेडियर श्री. चावला यांनी वृक्षलागवडीचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित केले. व या उपक्रमामुळे येणाऱ्या काळात सकारात्मक परिणाम होईल असे सांगितले. तसेच त्यांनी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल करीत असलेल्या कामाचे कौतुक केले.
या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणी साठी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सुनील कटारिया यांनी विशेष परिश्रम घेतले असून सर्व क्लब सदस्यांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे हा उपक्रम एक भव्य यशस्वी ठरला.
या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये रोटरी  क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सुनील कटारिया, सचिव अमर गुरप,(पीडीजी) पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शिरीष रायते, सहाय्यक प्रांतपाल ईश्वर बोरा, माजी सहाय्यक प्रांतपाल प्रसन्न खाजगीवाले, माजी अध्यक्ष डॉ.कुणाल कोल्हे ,जिल्हा टीआरएफ संचालक हरीश नय्यर, जिल्हा चेअर मनीष बोरा, राजेश परदेशी, चेतन अमरापूरकर, हितेश गुप्ता, सुजाता कटारिया, मीनल बोरा, सतीश कटारिया, निवृत्ती झिने, सुनील मुथा, संजय मुनोत, वसंत मुनोत, विनोद भंडारी यांचा समावेश होता. तसेच सीक्यूएव्हीचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल
 नेहमीच पर्यावरण, शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य आदी विविध क्षेत्रांमध्ये उपक्रम राबवून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा