राष्ट्रीय मीडिया महासंमेलनाचे उद्घाटन विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांचे हस्ते होणार

आबू रोड (राजस्थान) : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय मुख्यालय माऊंट आबू येथील 
शांतिवन कॅम्पस येथे मीडिया विंगच्या सौजन्याने 26 ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान राष्ट्रीय मीडिया महासम्मेलन आयोजित करण्यात आले आहे. या राष्ट्रीय मीडिया महासम्मेलनाचे
उद्घाटन विधानपरिषदेचे सभापती राम शंकरराव शिंदे यांच्या शुभहस्ते 27 सप्टेंबरला सकाळी 10:30 ला होणार आहे. मीडिया विंग च्या वतीने समन्वयक डॅा दीपक हरके यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती दिली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांना डॅा दीपक हरके यांनी ध्यानधारणेचे पुस्तक भेट दिले.

“समाजात शांती, एकता आणि विश्वास प्रस्थापित करण्यासाठी माध्यमांची भूमिका” हा या वर्षीच्या महासम्मेलनाचा विषय आहे.
या परिषदेत देशभरातून माध्यम क्षेत्राशी संबंधित विविध प्रतिनिधीं सहभागी होणार आहेत. त्यामध्ये वृत्तपत्र व मासिकांचे मालक, प्रकाशक, संपादक व संवाददाता, रेडिओ व टीव्ही चॅनेल्सचे सीईओ, डायरेक्टर, कार्यक्रम अधिकारी व पत्रकार, माहिती मंत्रालयाचे अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, न्यूज एजन्सीचे प्रतिनिधी, मीडिया प्राध्यापक व विद्यार्थी, लेखक, स्क्रिप्ट रायटर, चित्रपट निर्माता, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर, सोशल मीडिया तज्ज्ञ, पब्लिकेशन व प्रिंटिंग प्रेस प्रतिनिधी, चित्रपटगृह संचालक, केबल ऑपरेटर तसेच टपाल विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे.

या महासम्मेलनात अंदाजे 1500 मीडियाकर्मी सहभागी होणार आहेत.

परिषदेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. भोजन व निवासाची व्यवस्था नि:शुल्क करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी डॅा दीपक हरके यांना मोबाईल क्रमांक 9122288888 वर संपर्क साधावा

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा