ज्ञानसंपदा स्कूल च्या नुतन वास्तुचे 4 एप्रील ला सकाळी 9 वाजता उदघाटन

अहमदनगर - 2002-2003 साली काही समविचारी उद्योजकांनी सामाजिक जाणीवेतून ज्ञानसंपदा ही इंग्रजी माध्यमाची शाळा स्थापन केली. त्याशाळेच्या तपोवनरोड येथील नुतन भव्य इमारतीचे उदघाटन मंगलवार 4 एप्रील 2023 रोजी सकाळी 9 वाजता प.पु.स्वामी गोविंददेव गीरीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
सुरुवातीला फक्त १३ विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बजाज यांच्या निवासस्थानी सुरु करण्यात आली.शाळेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत या शाळारूपी रोपाने आपल्या वैभवात भर टाकत आज सुसज्ज इमारतीत 750 विधार्थांना घेऊन ज्ञानदानाचे कार्य अविरत करत आहे.
शाळा जरी इंग्रजी माध्यमाची असली तरी भारतीय संस्कृती आमच्या विद्यार्थ्यांमधे रुजवण्यासाठी शाळेने विविध उपक्रम नेहमीच हाती घेतले जसे की- कृतीयुक्त शिक्षण, परंपरा जोपासण्यासाठी विविध सण समारंभ, विज्ञान प्रदर्शन, मातृभाषा गौरव, नाट्यवाचन, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, दिंडी उपक्रम,आनंदजत्रेतून (fun fair) व्यवहार कौशल्य, वैचारिक उद्बोधन होण्यासा व्याख्यानमाला, किल्ले बनवा स्वर्धा, बदलत्या शिक्षणपद्धतीशी संलग्न राहण्यासाठी शिक्षक कार्यशाळा इत्यादी,
या सर्व उपक्रमांचे फलित म्हणून २०१३-१४ पासून शाळेच्या १०वी च्या १००% निकालाची उज्ज्वल परंपरा आजतागायत कायम आहे.
विचारभारती मंचातर्फे आयोजित स्वा. सावरकर - एक विचारधारा या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता ९ वी ची विद्यार्थिनी मनाली कुलकर्णी हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले, तसेच दामोदर मालपाणी ट्रस्ट व संस्कृत संवर्धन मंडळ, संगमनेर आयोजित संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धेत गेल्या सात वर्षांपासून सांधिक सहभाग घेतला जातो, व यश संपादन केले जाते. मेजर दिनभाऊ कुलकर्ण स्मरणार्थ सूर्यनमस्कार स्पर्धा तसेच माजी विद्यार्थी संघ आयोजित कशाकथन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले जाते.शाळेत विविध स्पर्धा परिक्षांचे आयोजन केले जाते. त्यासही विद्यार्थी उत्स्फूर्त सहभाग घेतात. जसे- स्कॉलरशिप, ऑलिंपियाड परिक्षाहोमी भाभा परीक्षा, हिंदी राष्ट्रभाषा परिक्षा इत्यादी.अशा प्रकारे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेऊन आमच्या या ज्ञानमंदिराची वाटचाल यशस्वीपणे चालू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा