◽ मख़दुम समाचार ◽
छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद (कार्तिक पासलकर) २६.४.२०२३
येथे नुकत्याच झालेल्या सभेत तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री केसीआर उर्फ के. चंद्रशेखर राव यांची सभा संपन्न पडली. सभेला लाखो लोक उपस्थित होते. या सभेत जनतेला संबोधित करताना के. चंद्रशेखर राव यांनी केंद्रातील मोदी सरकारवर कडाडून हल्ला केला. 'बेच के खाओ' या धोरणांचे त्यांनी यावेळी वाभाडे काढले.
तुम्ही आता कितीही खाजगीकरण करा, आम्ही सत्तेवर येताच त्याचे सरकारीकरण करू असे आव्हान त्यांनी मोदींना दिले.
त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारवरही त्यांनी ताशेरे ओढले. वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्या, अवकाळी गारपीटीबाबतीत सरकारी अनास्थेमुळे केसिआर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांनाही खडे बोल सुनावले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात तुमचे काय काम, तेलंगणा सांभाळा असे के सि राव यांना आव्हान दिले होते, त्यावरही जोरदार प्रत्युत्तर दिले. शेतकरी आत्महत्या थांबवा, तेलंगणाचे मॉडेल जसेच्या तसे महाराष्ट्रात राबवा, मग मी महाराष्ट्रात येणार नाही, असे म्हणून महाराष्ट्र सरकारला ठणकावून सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील युवकनेते ओंकार बडाख पाटील हे आपल्या शेकडो सहकारी कार्यकर्ते यांच्यासोबत सभेला उपस्थित होते तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. महिला व तरुणांचा यात लक्षणीय सहभाग होता. त्यांच्यासमोर बोलताना तेलंगणातील उपाययोजनांची जंत्री मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मांडली. रयतू बंधू, दलित बंधू, शेती क्लस्टर योजना, शेतकरी गृह, गरोदर महिलांना केसिआर किट, लग्नासाठी शादी मुबारक किट, वीज आणि पाणी २४ तास, तेही मोफत, सिंचनाचे यशस्वी जाळे अशा अनेक गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला.
सभेसाठी आमदार जीवन रेड्डी, खासदार बी. बी. पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस हिमांशू तिवारी, बिआरएस पक्ष समन्वयक प्रा. विजय मोहिते, दशरथ सावंत, बी.जे. देशमुख, ज्ञानेश वाकुडकर, सोमनाथ थोरात, गणेश कदम, बाबाराव कदम, कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या संपुर्ण सभेचे नियोजन चिकटगावकर, संतोष माने, फिरोज पटेल यांच्यासह इतर अनेक नेत्यांनी केले.
Post a Comment