छत्रपतीपदाचा व अधिकाराचा वापर उपेक्षित, वंचिताना न्याय देण्यासाठी व माणूस म्हणून समाजमान्यता मिळवून देण्यासाठी केला - डॉ. मंजुश्री पवार



◽ मख़दुम समाचार ◽
अहमदनगर (प्रतिनिधी)  २७.४.२०२३
     आपल्या छत्रपतीपदाचा व अधिकाराचा वापर उपेक्षित व वंचिताना न्याय देण्यासाठी व माणूस म्हणून समाज मान्यता मिळवून देण्यासाठी केला व प्रसंगी प्रस्थापित धर्म व्यवस्थेविरुद्ध बंड केले असे प्रतिपादन शाहू चरित्र अभ्यासक डॉ.मंजुश्री पवार यांनी केले, समाजशास्त्र मंडळ आयोजित कार्यक्रमात न्यू आर्ट्स महाविद्यालयात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भास्कर झावरे होते. पुणे विद्यापीठ समजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रुती तांबे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. 
        डॉ. पवार यांनी शाहूराजांच्या जीवनातील अनेक प्रसंगाची मांडणी करत, शाहू महाराज राजा असताना अतिशय वंचित उपेक्षित वर्गाच्या सामाजिक,  आर्थिक, शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न केले हे भारतातील कोणत्याही समकालीन राजाने हे कार्य केले नाही तर ते शाहू महाराजांनी केले म्हणून त्यांचे व्यक्तित्व स्मरणीय ठरले, असे त्या यावेळी म्हणाल्या. शाहू महाराजांच्या आयुष्यातील सर्व प्रसंग एक राजा म्हणून नव्हे तर ते समाज क्रांतिकारक होते यातून आजही प्रेरणा मिळते ते फक्त इतिहासाच्या पानातील राजे नाहीत तर आज ही समजाचे प्रेरणास्थान आहेत.
   अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. भास्कर झावरे यांनी विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराजाच्या चरित्राचा अभ्यास करून आजच्या काळातील समाजिक प्रश्नांची उत्तरे व उपाय शोधावेत. आजच्या अनेक गंभीर समस्याची उत्तरे शाहू चरित्रातून मिळतील, असे मनोगत व्यक्त केले.
    उपप्राचार्य डॉ.बी.बी.सागडे, समाजशास्त्र मंडळाचे डॉ. किसन अंबाडे, डॉ.अमन बगाडे, डॉ.पी.टी. शेळके, प्रा.प्राजक्ता ठुबे, डॉ. मिना साळे, डॉ.होळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसचालन प्रा.गणेश निमसे यांनी तर आभार डॉ. नागेश शेळके यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थी व प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते.





🤩 देशाची फेव्हरेट बाईक स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक मध्ये; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा