'अवकाळी'चा पुन्हा तडाखा; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची चांदेकरांची मागणी !

▫️ मख़दुम समाचार ▫️ 
नेवासा (कार्तिक पासलकर) २७.४.२०२३
 तालुक्यातील चांदा परिसरात काल सायंकाळी ५ च्या सुमारास मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. चांदा बाजारपेठेतील विजेचा खांब कोसळून तांबोळी यांच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले तसेच चांदा-कुकाणा रोडवर उस्मान भाई यांच्या पत्र्याचे शेड उडून गेले. हायवेवर झाड पडून रस्ता बंद पडून काही काळ वाहतुक ठप्प झाली होती. विजय दहातोंडे, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब नाना दहातोंडे, सागर दिवटे यांनी रस्त्यावरील झाड हटवून वाहतुकीला रस्ता खुला करून दिला. ग्रामपंचायत सदस्य सादिक भाई शेख, सागर जावळे, मिनीनाथ थिटे यांनी घटनास्थळी जाऊन मदत केली.
    परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागचे पंचनामे झाले नाहीत, तोच पुन्हा अवकाळी पावसाने पुन्हा तडाखा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.





🤩 देशाची फेव्हरेट बाईक स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक मध्ये; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज


Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा