एकता कल्चरल अकादमीच्या वतीने राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन


मख़दूम समाचार 
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) २०.८.२०२३
    ३५ व्या एकता सांस्कृतिक महोत्सवातर्फे एकता कल्चरल अकादमीच्या वतीने गणपत गुणाजी जाधव स्मरणार्थ राज्यस्तरीय 'काव्यलेखन स्पर्धा-२०२३' आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक कवी-कवियत्रींनी आपल्या दोन कविता, संपूर्ण माहिती, फोटोसहीत ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत पुढील पत्यावर पाठविणे. अध्यक्ष-  प्रकाश गणपत जाधव, एकता कल्चरल अकादमी, ए/२०४, विशाल हेवन सोसायटी, मनवेल पाडा रोड, विरार (पू). ४०१३०५ (जळबाववाडी समोर) संपर्क 9220899120. प्रवेश शुल्क - १०० रुपये  गुगल पे 8177870586 पाठवू शकता तसेच कवितेसाठी विषयाचे बंधन नाही, दीर्घ कविता नको. विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय, २०००, १०००, ७०० रुपये, तसेच उत्तेजनार्थ ५ पारितोषिक १०० रुपये, एकता सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
       पारितोषिक वितरण सोहळा डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ३५ वा एकता सांस्कृतिक महोत्सवात प्रदान करण्यात येणार आहे, असे एकताचे सचिव कवी प्रकाश पाटील यांनी एका जाहीर केले आहे. अधिक माहितीसाठी ९२२०८९९१२० संपर्क करावा.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा