विद्या भडके यांना अभिनव खानदेश प्रेरणादायी महिला पुरस्कार

शेवगाव – *‘प्रज्ञावंतांची समाजाला आवश्यकता असून विद्या भडके सारख्या महिला ज्ञानदानासोबतच साहित्यिक कार्यात असल्याने त्यांच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वृंदावू शकतात म्हणूनच अशा  महिलांचा गौरव करताना आनंद होतो आहे*.’,असे प्रतिपादन धुळ्याच्या महापौर सौ.प्रतिभाताई चौधरी यांनी केले.
       अभिनव खानदेशच्या उपसंपादिका सौ.नलिनी सूर्यवंशी यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त साहित्य,कला,सामाजिक,शैक्षणिक  क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला,त्यावेळी त्या बोलत होत्या.धुळे येथील शिवतीर्थ नागरीक संघात झालेल्या कार्यक्रमास माजी आमदार शरद पाटील, ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर,संपादक प्रभाकर सूर्यवंशी,निवृत्त न्यायाधीश अडव्होकेट बापूसाहेब देसले, संगमनेर लोकपंचायत अध्यक्ष,विजय थोरात,ज्येष्ठ पत्रकार प्रा.अनिल चव्हाण डॉक्टर जितेंद्र ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून होते.
     श्रीमती विद्या  भडके यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.त्यांचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध असून त्या शब्दगंध साहित्यिक परिषद,शेवगाव शाखेच्या सह सचिव म्हणून कार्यरत आहेत.मुंबई,पुणे,शिरपूर, सांगली,बोधेगाव येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक  पाच महिलांना हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राचार्या रत्ना पाटील यांनी काव्यप्रचुर पद्धतीने  केले होते.श्रीमती विद्या भडके यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे,शेवगाव शाखेचे अध्यक्ष हरिभाऊ नजन,बाप्पुसाहेब भोसले यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा