शांतिनिकेतन फार्मसी महाविद्यालयात राज्यस्तरीय चर्चासत्राचे व पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन

अहमदनगर - पारनेर तालुक्यातील धोत्रे बु.येथील शांतिनिकेतन फार्मसी महाविद्यालयात २८ फेब्रवरी २०२४ राज्यस्तरीय चर्चासत्राचे व पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. बालीरेड्डी यांनी दिली.
या चर्चासत्रा साठी प्रमुख वक्ते डॉ. मनोज तारे  (सीताबाई थिटे फार्मसी कॉलेज, शिरूर), प्रा. दिपाली शेळके (नांदेड फार्मसी कॉलेज, नांदेड) व डॉ. संजय पाटील (श्रीमान सुरेश  दादा  जैन फार्मसी कॉलेज,चांदवड) आदी मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती उपप्राचार्य प्रा. जयदीप पवार यांनी दिली.
या चर्चासत्रा बरोबरच राज्यस्तरीय पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे तसेच डी. फार्मसी व बी. फार्मसी अशा दोन स्वतंत्र गटात राज्यातील फार्मसी विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविता येणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व दोन्ही गटातील विजेत्यांना रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार असल्याची माहिती प्रा.राजू डहाळे यांनी दिली. सदर स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी प्रा.राजू डहाळे (९१३०९८२८५४) यांच्याशी संपर्क साधावा.
या राज्यस्तरीय चर्चासत्रा साठी प्रा. कांचन जाधव, प्रा. प्राची देवडे, प्रा. निरंजन तिवारी, प्रा. सुयोग देवडे, प्रा. भक्ती वाघ, प्रा. विकास पळसकर, प्रा. शितल वाघमारे तसेच पोस्टर प्रदर्शन  स्पर्धा आयोजनासाठी प्रा. विद्या पवार, प्रा. अयोध्या खेडकर, प्रा. मयुरी टाक, डॉ. प्रतीक्षा अनारसे आदी प्रयत्नशील आहेत.
विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर अशा या स्तुत्य उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत शिंदे आणि सचिव प्रा. सोनाली शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या उपक्रमासाठी विद्यार्थांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विभाग प्रमुख प्रा. प्रियांका साबळे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा