समजा भक्तांच्या म्हणण्यानुसार बांगलादेश , पाकिस्तान एकत्रित करून अखंड भारत पुन्हा निर्माण झाला तर काय होईल ?
भारताची लोकसंख्या १३९ कोटी, पाकिस्तानची २२.५० कोटी आणि बांगलादेश १६.६३ कोटी.
भारतात ५४३ खासदार आहेत, म्हणजे २५ लाख लोकसंख्येला एक खासदार.
पाकिस्तानचे खासदार होतील ९० आणि बांगलादेश चे खासदार होतील ६६.
एकूण खासदारांची संख्या ६९९ , म्हणजे स्पष्ट बहुमताला किमान ३५० खासदार लागणार.
आता भाजपचे सध्याचे खासदार किती आहेत याचा हिशोब लावा आणि मग नव्या लोकसभेत कुणाच बहुमत राहील आणि कोण विरोधी पक्षनेता राहील याचा विचार करा.
शिवाय या १७८ कोटी लोकांची पोट भरायची हि जबाबदारी सरकारची असेल.
मग आपल्याला बांगलादेश आणि पाकिस्तानची भूमी, नैसर्गिक साधन, खनिज,बंदर, संपत्ती हवीय पण तिथली लोक नकोत अस आहे का ?
मग हि ४० कोटी लोक कुठ धाडायची ?
श्रीलंकेत कि अफगाणिस्थान मध्ये कि चीन मध्ये कि नेपाळ मध्ये कि थेट रशियात ?
या ४० कोटी लोकांच स्थलांतर करायला लागणारा पैसा, यंत्रणा ,साधन, वाहने यांचा खर्च किती ?
आणि हि लोक सुखासुखी जातील ?
परागंदा होतील ?
आपल्याच सरकारच्या अत्याचाराने पिडीत झालेले शरणार्थी जेव्हा लाखोंच्या संख्येने भारतात घुसायला लागले तेव्हा इंदिरा गांधीना कठोर पावल उचलून बांगलादेश निर्मिती करावी लागली.
४० कोटी लोकांच तुम्ही नेमक काय करणार हा प्रश्न आधी सोडवायला लागणारे आणि मग ढोल ताशे नगारे वाजवायला सुरुवात करायची.
बाकी या अखंड भारताच्या भंपक,बाष्कळ,अव्यवहार्य मृगजळाच्या मागे धावणारे मंदबुद्धी आणि माठ लोक आहेत याची खात्री भागवत आणि कंपूला आहे म्हणूनच या पिचक्या पिपाण्या अधूनमधून वाजवण्याची उबळ त्यांना येते आणि त्या पिपाण्याना रणवाद्य समजून नसलेली छाती फुगवून ढोल वाजवायची उबळ भक्तांना येते.
आनंद शितोळे
#आपल्या_धडावर_आपलेच_डोके
#अखंड_भारत
Post a Comment