अहमदनगर : जागतिक आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त शेवंगाव येथील प्रा. डॉ.शंकर चव्हाण यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला असुन २७ मार्च रोजी नागपूर येथे तो प्रदान करण्यात येणार आहे. प्रा.डॉ.शंकर चव्हाण हे पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयातुन उपप्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालेले असुन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत.
त्यांचे 'प्रिये', 'मशाल', 'कोंडमारा', 'दमन', 'जिने चंदनाचे', 'कामगार चळवळ एक विश्लेषण' अशी पुस्तकं प्रकाशित झाली असुन विद्यापीठस्तरावर संदर्भ ग्रंथ म्हणुन त्यांची काही पुस्तकं आहेत,विविध सामाजिक,साहित्यिक व शैक्षणिक चळवळीमध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान असुन त्यांना यापूर्वी २७ पुरस्कार व पारितोषिक मिळालेली आहेत.अहमदनगर व पुणे आकाशवाणी वर त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत.त्यांच्या एकूण कार्याची दखल घेऊन त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे. पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल आमदार लहू कानडे,पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभयराव आव्हाड,उपाध्यक्ष ऍड सुरेशराव आव्हाड, शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे,संस्थापक सुनील गोसावी,भगवान राऊत,प्राचार्य शिवाजीराव देवढे,प्राचार्य जी.बी.ढाकणे, बाप्पूसाहेब भोसले,माजी जि. प.सदस्य पवनकुमार साळवे,प्रा.जयंत गायकवाड यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment